शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

वृद्धाचा नऊ वर्षे संघर्ष

By admin | Updated: July 18, 2016 02:10 IST

आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करूनही या तपासात प्रगती शून्यच असल्याचा आरोप कन्हय्या मोटवानी या ७८ वर्षीय वृद्धाने केला

मुंबई : अंधेरी येथील चकाला येथील पॉप्युलर कार बाजार परिसरातील आपला भूखंड बळकावल्याच्या आरोपावरून हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) तसेच अन्य आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करूनही या तपासात प्रगती शून्यच असल्याचा आरोप कन्हय्या मोटवानी या ७८ वर्षीय वृद्धाने केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत केवळ दोनच आरोपींना अटक करण्यात आली असून, एचडीआयएल कंपनीच्या संचालकांसह अन्य चार आरोपींविरुद्ध कोणतीच कारवाई झालेली नाही. चकाला परिसरातील २५,२७१ चौ.मीटर म्हणजेच सुमारे आठ एकरचा अविभक्त भूखंड अर्जुनदास ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा होता. कन्हय्या मोटवानी यांनी १९९४ साली ३.९५ कोटी रुपयांना या भूखंडाचे विकासहक्क खरेदी केले. या भूखंडाच्या संरक्षणासाठी मोटवानी यांनी त्याभोवती कंपाउंड बांधून आत एक कार्यालयासाठी बंगला विकत घेतला होता. त्यानंतर ठाकूर कुटुंबीयांनी या भूखंडाचा काही भाग परस्पर पॉप्युलर कार बाजारला विकला. त्यातून मोटवानी आणि ठाकूर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. मोटवानी त्यावर उच्च न्यायालयात गेले. याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत तिसऱ्या पक्षाचा या भूखंडावर हक्क निर्माण होणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला. मात्र या आदेशानंतरही २00८ साली ठाकूर कुटुंबीयांनी हा भूखंड एचडीआयएल कंपनीला विकून आपली फसवणूक केल्याचा मोटवानी यांचा आरोप आहे.मोटवानी यांच्या तक्रारीवरून ५ डिसेंबर २0१३ रोजी कफ परेड पोलिसांनी एफआरआर दाखल केला. ठाकूर कुटुंबातील सहा जण आणि एचडीआयएल कंपनीचे संचालकांना यात आरोपी करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले. येथील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राजीव ठाकूर आणि आशिष ठाकूर या दोघांना अटक केली. मात्र पुढे तपास खुंटला आणि अन्य आरोपींवर कारवाई झालीच नाही. आजमितीस तपास पूर्णपणे थांबला आहे. आतापर्यंत पाच तपास अधिकारी बदलले. सहा महिन्यांपूर्वी याबाबत आपण सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांचीही भेट घेतली. त्यांनी सर्व आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याचे मोटवानी यांनी सांगितले. ‘ही जमीन १९९४ ते फेब्रुवारी २0११ या कालावधीपर्यंत माझ्या ताब्यात होती. ही जमीन विकता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचा करार करता येणार नाही, अशी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली होती. विशेष म्हणजे एचडीआयएलनेही वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत त्यात या जमिनीच्या सर्व हक्कधारकांबाबत चौकशी करीत असल्याचे नमूद केले. ‘ही नोटीस वाचताच आमच्या वकिलांनी एचडीआयएलशी संपर्क साधत हा भूखंड आमच्या फर्मचा असल्याचे स्पष्ट केले. त्यावर ‘आम्ही तुमच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करू, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र पुढे काहीही झाले नाही’, असे मोटवानी यांनी सांगितले. या जमिनीचा विकास करारनामा झाला असल्याचे माहीत असताना एचडीआयएलचे संचालक वरायम सिंग यांनी २00८ मध्ये ठाकूर कुटुंबीयांशी करार करून माझे या जमिनीतील हक्क कायदेशीर मार्गाने संपादन करण्याची हमी घेतली होती. परंतु नंतर जबरदस्तीने कब्जा घेतल्याची मोटवानी यांची तक्रार आहे. >बनावट कागदपत्रांचा तपास व्हावाया प्रकरणात केवळ आपली फसवणूक झाली नसून, एचडीआयएल आणि ठाकूर कुटुंबीयांनी त्यांना कायदेशीर अधिकार नसताना या जमिनीचा दुसऱ्यांदा खरेदी व्यवहार केला आहे. या व्यवहारासाठी वापरलेली संबंधित कागदपत्रे बनावट असल्याने याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे असे म्हणत मोटवानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.