शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वृद्धाचा नऊ वर्षे संघर्ष

By admin | Updated: July 18, 2016 02:10 IST

आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करूनही या तपासात प्रगती शून्यच असल्याचा आरोप कन्हय्या मोटवानी या ७८ वर्षीय वृद्धाने केला

मुंबई : अंधेरी येथील चकाला येथील पॉप्युलर कार बाजार परिसरातील आपला भूखंड बळकावल्याच्या आरोपावरून हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) तसेच अन्य आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करूनही या तपासात प्रगती शून्यच असल्याचा आरोप कन्हय्या मोटवानी या ७८ वर्षीय वृद्धाने केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत केवळ दोनच आरोपींना अटक करण्यात आली असून, एचडीआयएल कंपनीच्या संचालकांसह अन्य चार आरोपींविरुद्ध कोणतीच कारवाई झालेली नाही. चकाला परिसरातील २५,२७१ चौ.मीटर म्हणजेच सुमारे आठ एकरचा अविभक्त भूखंड अर्जुनदास ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा होता. कन्हय्या मोटवानी यांनी १९९४ साली ३.९५ कोटी रुपयांना या भूखंडाचे विकासहक्क खरेदी केले. या भूखंडाच्या संरक्षणासाठी मोटवानी यांनी त्याभोवती कंपाउंड बांधून आत एक कार्यालयासाठी बंगला विकत घेतला होता. त्यानंतर ठाकूर कुटुंबीयांनी या भूखंडाचा काही भाग परस्पर पॉप्युलर कार बाजारला विकला. त्यातून मोटवानी आणि ठाकूर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. मोटवानी त्यावर उच्च न्यायालयात गेले. याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत तिसऱ्या पक्षाचा या भूखंडावर हक्क निर्माण होणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला. मात्र या आदेशानंतरही २00८ साली ठाकूर कुटुंबीयांनी हा भूखंड एचडीआयएल कंपनीला विकून आपली फसवणूक केल्याचा मोटवानी यांचा आरोप आहे.मोटवानी यांच्या तक्रारीवरून ५ डिसेंबर २0१३ रोजी कफ परेड पोलिसांनी एफआरआर दाखल केला. ठाकूर कुटुंबातील सहा जण आणि एचडीआयएल कंपनीचे संचालकांना यात आरोपी करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले. येथील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राजीव ठाकूर आणि आशिष ठाकूर या दोघांना अटक केली. मात्र पुढे तपास खुंटला आणि अन्य आरोपींवर कारवाई झालीच नाही. आजमितीस तपास पूर्णपणे थांबला आहे. आतापर्यंत पाच तपास अधिकारी बदलले. सहा महिन्यांपूर्वी याबाबत आपण सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांचीही भेट घेतली. त्यांनी सर्व आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याचे मोटवानी यांनी सांगितले. ‘ही जमीन १९९४ ते फेब्रुवारी २0११ या कालावधीपर्यंत माझ्या ताब्यात होती. ही जमीन विकता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचा करार करता येणार नाही, अशी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली होती. विशेष म्हणजे एचडीआयएलनेही वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत त्यात या जमिनीच्या सर्व हक्कधारकांबाबत चौकशी करीत असल्याचे नमूद केले. ‘ही नोटीस वाचताच आमच्या वकिलांनी एचडीआयएलशी संपर्क साधत हा भूखंड आमच्या फर्मचा असल्याचे स्पष्ट केले. त्यावर ‘आम्ही तुमच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करू, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र पुढे काहीही झाले नाही’, असे मोटवानी यांनी सांगितले. या जमिनीचा विकास करारनामा झाला असल्याचे माहीत असताना एचडीआयएलचे संचालक वरायम सिंग यांनी २00८ मध्ये ठाकूर कुटुंबीयांशी करार करून माझे या जमिनीतील हक्क कायदेशीर मार्गाने संपादन करण्याची हमी घेतली होती. परंतु नंतर जबरदस्तीने कब्जा घेतल्याची मोटवानी यांची तक्रार आहे. >बनावट कागदपत्रांचा तपास व्हावाया प्रकरणात केवळ आपली फसवणूक झाली नसून, एचडीआयएल आणि ठाकूर कुटुंबीयांनी त्यांना कायदेशीर अधिकार नसताना या जमिनीचा दुसऱ्यांदा खरेदी व्यवहार केला आहे. या व्यवहारासाठी वापरलेली संबंधित कागदपत्रे बनावट असल्याने याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे असे म्हणत मोटवानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.