शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

नऊ बालमजुरांना दोन महिने ठेवले होते डांबून

By admin | Updated: July 1, 2016 02:46 IST

कुरार परिसरातून सुटका झालेल्या ओडिशाच्या ९ बालमजुरांना दोन महिने खोलीत डांबून ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मुंबई : कुरार परिसरातून सुटका झालेल्या ओडिशाच्या ९ बालमजुरांना दोन महिने खोलीत डांबून ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या मुलांना १२ ते १३ तास राबवून घेतले जाई. त्यांना मोबदला देणे दूरच दोन वेळचे जेवणही वेळेवर दिले जात नसल्याची माहिती मुलांनी दिली आहे. मूळचे ओडिशा येथील रहिवासी असलेल्या या मुलांचे ९ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले. कोलकाता परिसरात ४ दिवसांचे काम असल्याचे सांगून या मुलांना नेण्यात आले होते. जास्तीच्या पैशांच्या आमिषाने ही मुले निघून गेली. त्यानंतर कोलकातामार्गे या मुलांना मुंबईतील कारखान्यात नेण्यात आले. आपण मुंबईला केव्हा पोहोचलो हे या चिमुकल्यांना उमगलेच नाही. यामध्ये १३ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. मालाडच्या आप्पापाडा परिसरात असलेल्या दिवकृपा सोसायटीमधील खोलीत ही मुले राहत होती. मुंबईतील जापू शाखेचे एपीआय सुरेश शिंदे आणि तुकाराम जगताप यांच्या पथकाने छापा टाकून त्यांची सुटका केली. चौकशीत तब्बल दोन महिने या मुलांना खोलीतच डांबून ठेवण्यात आले होते. घरमालक बाहेर जाताना कुलूप लावून जात असे. तब्बल १२ ते १३ तास या मुलांकडून काम करून घेतले जाई. एक वेळ वडापाव खाऊन ही मुले गुजराण करत. अनेकदा या मुलांनी घरी जाण्यास हट्ट केला. पर्यायी मालकाचा मार त्यांच्या पदरी पडला. त्यांना डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत. ओडिशा पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या प्रकरणी कारखाना चालक, त्याचा पार्टनर आणि दोन पर्यवेक्षकांना अटक करण्यात आली होती. संदीप निर्मल जाना (२८), जयप्रकाश तिलकधारी यादव (३५), विभास गुणेधर सामंत (२५) आणि मानस नंदन पाया (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)