शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नऊ बालमजुरांना दोन महिने ठेवले होते डांबून

By admin | Updated: July 1, 2016 02:46 IST

कुरार परिसरातून सुटका झालेल्या ओडिशाच्या ९ बालमजुरांना दोन महिने खोलीत डांबून ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मुंबई : कुरार परिसरातून सुटका झालेल्या ओडिशाच्या ९ बालमजुरांना दोन महिने खोलीत डांबून ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या मुलांना १२ ते १३ तास राबवून घेतले जाई. त्यांना मोबदला देणे दूरच दोन वेळचे जेवणही वेळेवर दिले जात नसल्याची माहिती मुलांनी दिली आहे. मूळचे ओडिशा येथील रहिवासी असलेल्या या मुलांचे ९ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले. कोलकाता परिसरात ४ दिवसांचे काम असल्याचे सांगून या मुलांना नेण्यात आले होते. जास्तीच्या पैशांच्या आमिषाने ही मुले निघून गेली. त्यानंतर कोलकातामार्गे या मुलांना मुंबईतील कारखान्यात नेण्यात आले. आपण मुंबईला केव्हा पोहोचलो हे या चिमुकल्यांना उमगलेच नाही. यामध्ये १३ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. मालाडच्या आप्पापाडा परिसरात असलेल्या दिवकृपा सोसायटीमधील खोलीत ही मुले राहत होती. मुंबईतील जापू शाखेचे एपीआय सुरेश शिंदे आणि तुकाराम जगताप यांच्या पथकाने छापा टाकून त्यांची सुटका केली. चौकशीत तब्बल दोन महिने या मुलांना खोलीतच डांबून ठेवण्यात आले होते. घरमालक बाहेर जाताना कुलूप लावून जात असे. तब्बल १२ ते १३ तास या मुलांकडून काम करून घेतले जाई. एक वेळ वडापाव खाऊन ही मुले गुजराण करत. अनेकदा या मुलांनी घरी जाण्यास हट्ट केला. पर्यायी मालकाचा मार त्यांच्या पदरी पडला. त्यांना डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत. ओडिशा पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या प्रकरणी कारखाना चालक, त्याचा पार्टनर आणि दोन पर्यवेक्षकांना अटक करण्यात आली होती. संदीप निर्मल जाना (२८), जयप्रकाश तिलकधारी यादव (३५), विभास गुणेधर सामंत (२५) आणि मानस नंदन पाया (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)