शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

लातुरमध्ये देशमुखविरुद्ध निलंगेकर लढाई

By admin | Updated: January 20, 2017 00:09 IST

लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे.

दत्ता थोरे,

लातूर- लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे. विलासरावांचे धोरले चिरंजीव अमित देशमुख यांच्या पाठोपाठ आता धाकटे चिरंजीव धीरज यांचेही राजकारणात पदार्पण होऊ घातले असून त्यांच्या ‘लाँचिंग’साठी काका दिलीपराव देशमुख यांनी मोर्चेबांधणी केली आहे,जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या गटाला असल्याने धीरज देशमुख यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे. १९८२ साली लातूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख हे पहिले अध्यक्ष. तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषदेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. शिवाय, देशमुखांच्या गढीवरच जि. प. च्या किल्ल्या कायम राहिल्या. सध्या काँग्रेसकडे ३५ जागा आहेत, तर भाजपाकडे आठ, राष्ट्रवादीचे नऊ तर सेनेचे पाच सदस्य आहेत. सेनेला जिल्ह्यात चेहरा नाही. तर राष्ट्रवादी ‘गट’बंबाळ झालीय. त्यामुळे झुंज होईल ती काँग्रेस विरुध्द भाजपातच. नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्व ठिकाणी सत्तेच्या भरल्या पंक्तीतून उठावे लागले. आधी लोकसभा, नंतर विधानसभा, नगरपंचायत आणि आता नगरपरिषद या सर्वच ठिकाणांहून जिल्ह्यात काँग्रेसला कुठेही समाधानकारक यश मिळाले नाही. बालेकिल्ल्यात चोहोबाजूंनी अशा पडझडीच्या मौसमात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. लातूर (१०), औसा (९), निलंगा (९), उदगीर (७), आणि अहमदपूर (६) या पाच तालुक्यात ४१ जागा आहेत. पैकी उदगीरसह जळकोटवर भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव, अमहदपूरमध्ये नुकतेच भाजपात आलेले आमदार विनायक पाटील तर देवणी, शिरुरअनंतपाळ आणि निलंग्यावर खुद्द संभाजीराव पाटील यांचे वर्चस्व आहे. तर काँग्रेसकडे अमित देशमुख (लातूर) , त्र्यंबक भिसे (लातूर ग्रामीण) व बस्वराज पाटील (औसा) असे राजकीय पाठबळ आहे. शिवाय, या निवडणुकीची सर्व सुत्रे दिलीपराव देशमुख यांनी हाती घेतल्याने त्यांचे ‘मॅनेजमेन्ट’ कौशल्य पणाला लागले आहे. या जिल्ह्याने पूर्वी विलासरावविरुद्ध शिवाजीराव पाटील निलंगेकर असा राजकीय संघर्ष पाहिला आहे. कालांतराने दोन्ही गटात समेट घडून विलासराव व निलंगेकर एकत्र आले. आता दुसऱ्यापिढीत पुन्हा हा संघर्ष उभा ठाकला आहे. विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुख यांची जिल्हा परिषदेत एन्ट्री रोखण्यासाठी संभाजीराव निलंगेकर यांनी कंबर कसली आहे.सुरुवातीला अध्यक्षपद हे महिलेला राखीव होते. परंतु नव्याने झालेल्या सोडतीत ते खुुल्या गटाला आले. या अदलाबदलीत देशमुख परिवाराला धीरज देशमुख यांच्या ‘पॉलिटिकल लॉचिंग’चे वेध लागले आहेत.