शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

नववर्षही महागाईचेच!

By admin | Updated: November 30, 2015 03:30 IST

गेल्या दोन वर्षांपेक्षा २०१५मध्ये महागाईने नवा उच्चांक गाठत ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्यानंतर आता, नवीन वर्षातही महागाईचीच धग अनुभवायला मिळणार आहे.

मनोज गडनीस, मुंबई गेल्या दोन वर्षांपेक्षा २०१५मध्ये महागाईने नवा उच्चांक गाठत ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्यानंतर आता, नवीन वर्षातही महागाईचीच धग अनुभवायला मिळणार आहे. भारतात यंदा झालेला पाऊस आणि त्याचा विविध पिकांना बसलेला फटका याची आकडेवारी काही आघाडीच्या बाजार विश्लेषक संस्थांनी प्रसिद्ध केली असून, त्यांच्या विश्लेषणानुसार यंदाच्या तुलनेत २०१६च्या वर्षात सरासरी कमाल १० टक्क्यांनी महागाईच्या दरात वाढ होताना दिसेल.भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणाऱ्या या कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून नववर्षात महागाईची चुणूक जावणते. उपलब्ध माहितीनुसार, देशात विविध अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्र, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून पावसाची सर्वाधिक तूट दिसून आली असून, याचा थेट फटका संबंधित राज्यांतील प्रमुख पिकांना मोठ्या प्रमाणावरबसणार असल्याचा अंदाज आकडेवारीसह वर्तविण्यात आला आहे. या सर्व पिकांचे उत्पादन, बाजारातील मागणी व पुरवठा यांचे गणित विस्कळीत होणार असल्यामुळे महागाई आणखी डोके वर काढेल, असे मत अर्थतज्ज्ञ अजय चारी यांनी व्यक्त केले. दुग्धोत्पादनही घटणारगेल्या दोन वर्षांपासून दुधाच्या उत्पादनात घट नोंदली गेली आहे. उत्पादनातील घट होण्याचा ट्रेण्ड नववर्षातही कायम राहण्याचे संकेत दूध उत्पादक संघटनांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्या मते २०१६ या वर्षी देशातील दुधाच्या एकूण उत्पादनात ५ ते ७ टक्के घट होईल व याचा परिणाम दुधाच्या किमती वाढण्याच्या रूपाने दिसून येईल. महागाई तेव्हाची आणि आताची२०११ ते २०१४ या कालावधीत भडकलेल्या महागाईत सातत्याने वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीचे तेल ओतले गेले होते. या ३ वर्षांत १०० ते १४५ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल असा कच्च्या तेलाचा दर होता. यामुळे महागाईचा आगडोंब उसळला होता. परंतु, यंदा स्थिती उलट आहे. कारण, जून २०१४पासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीचा प्रवास हा सातत्याने घसरणीचा आहे.तेलाच्या किमतीने ३८ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल इतका नीचांक गाठून आता, हे दर ४५ ते ५० डॉलरच्या घरात आहेत. मात्र, तरीही घसरलेल्या तेलाच्या किमतीचा म्हणावा इतका फायदा होत नसल्याने आणि त्यातच कमी पाऊस यामुळे महागाईचा आलेख उंचावलेलाच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या असलेल्या किमती आणि त्या अनुषंगाने भारतीय बाजारात दर कपात झाली तर, सध्या असलेली महागाई अडीच ते पाच टक्क्यांनी आटोक्यात आणणे शक्य होईल, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. अजय सहानी यांनी व्यक्त केले. > या पिकांना सर्वाधिक फटकाखरीप पिकांचा हंगाम आता सुरू झाला असला तरी, पावसाच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने तूर, चणा, मसूर, उडीद, ज्वारी, सोयाबीन, तांदूळ, गहू आदी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून, पाचही राज्यांतील सरासरी पिकांचे उत्पादन व मागणी पुरवठ्याचा विचार करता या उत्पादनांची तूटही ३४ टक्के इतकी असेल. 2014मध्ये ही तूट २८ टक्क्यांच्या आसपास होती. त्या तुलनेत नववर्षात ही झळ अधिक बसणार आहे. उत्पादनाचा विचार करता आगामी सहा महिन्यांत या सर्व धान्यांच्या किमतीमध्ये 8-12% वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमी पावसामुळे जी परिस्थिती धान्याची आहे, तीच परिस्थिती फळ आणि भाज्यांच्या बाजारातही आहेच. कोथिंबीर, कांदा, बटाटा, टोमॅटो तसेच विविध प्रकाराच्या भाज्यांचे दर आताच सरासरी २० रुपये पाव किलोच्या वर आहेत. जरी नवीन पीक बाजारात आले तरी मागणीच्या तुलनेत व्यस्त प्रमाणातील पुरवठ्याच्या गणितामुळे त्यांचेही दर वाढतानाच दिसत आहेत.एप्रिल २०१६पर्यंत फळ-भाज्यांच्या किमतींमध्ये किमान ८ ते कमाल १५ टक्के इतकी वाढ होताना दिसेल.