शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

एप्रिलपासून मध्य रेल्वे लोकलचे नवीन वेळापत्रक

By admin | Updated: February 15, 2017 03:35 IST

रेल्वे अर्थसंकल्पातून मुंबई उपनगरीय रेल्वेला दिलासा देण्यात आल्यानंतर आता एप्रिल महिन्यापासून लागू होणाऱ्या नवीन लोकल

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पातून मुंबई उपनगरीय रेल्वेला दिलासा देण्यात आल्यानंतर आता एप्रिल महिन्यापासून लागू होणाऱ्या नवीन लोकल वेळापत्रकातून दिलासा मिळतो की नाही हे पाहण्यासारखे ठरेल. मध्य रेल्वे लोकलचे नवीन वेळापत्रक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागू केले जाणार आहे. या वेळापत्रकात दिवासाठी आणखी दहा जलद लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात येईल. त्याचबरोबर ट्रान्स हार्बर प्रवाशांनाही दिलासा देताना १0 वाढीव फेऱ्या मिळतील. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी, पनवेलचा प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी केली जाते. दिवा स्थानकात तर जलद लोकल फेऱ्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले आणि ही मागणी लक्षात घेता आॅक्टोबर २0१६ पासून अप आणि डाऊन मार्गावर मिळून २४ फेऱ्यांना थांबा देण्यात आला. परंतु यात कर्जत, अंबरनाथ यासह लांबच्या अंतरावरील गाड्यांचा समावेश होता. त्यामुळे गर्दीच्या वेळेत या गाड्यांचा फारसा फायदा दिवावासीयांना मिळत नव्हता. आणखी जलद लोकल फेऱ्या मिळाव्यात, अशी मागणी पुन्हा होत असल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणखी १0 जलद फेऱ्यांना थांबा देण्याचा विचार असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिल महिन्यात लोकलचे नवीन वेळापत्रक येणार असून त्यात या फेऱ्यांचा समावेश असेल, अशी माहिती देण्यात आली. ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावरीलही प्रवाशांची संख्या वाढत आहे. या मार्गावर २३२ लोकल फेऱ्या होतात. नवी मुंबईत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने उभी राहणारी संकुले आणि कार्यालये यामुळे येथील लोकसंख्येत वाढ होत असून, ठाणे ते पनवेल, वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकललाही गर्दी होताना दिसते. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेकडून फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांत तब्बल २१0 फेऱ्यांची भर पडली आहे. नवीन वेळापत्रकात आणखी दहा लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या ही २३२ वरून २४२ होईल. २00६-0७ मध्ये याच मार्गावर साधारण तीन ते चार लोकलच्या २२ फेऱ्या चालविण्यात येत होत्या. २00८-0९ मध्ये त्यात १0४ फेऱ्यांची भर पडली. त्यानंतर दर दोन वर्षांनी लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले. (प्रतिनिधी)

मध्य रेल्वेवर एकूण १६५८ लोकल फेऱ्या दिवसभरात होतात. यात ८३६ फेऱ्या या मेन लाइनच्या, हार्बरच्या ५९0 तर ट्रान्स हार्बरच्या २३२ फेऱ्या होतात. मेन लाइनवर लोकल फेऱ्या वाढवण्याची क्षमता संपुष्टात आली आहे.त्यामुळे या मार्गावरील फेऱ्या वाढवायच्या की नाही यावर विचार केला जात आहे. हे पाहता कमी अंतराच्या लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्यावरच भर दिला जाईल.