शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीहरी अणेंचा नवा राजकीय पक्ष

By admin | Updated: September 25, 2016 01:22 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची शनिवारी घोषणा केली. या पक्षाची लवकरच राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येईल. यानंतर निवडणुका लढविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) लकडगंज येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी ही घोषणा करताना, आगामी स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले. १ मे २०१५ रोजी सिंदखेड राजा येथे विदर्भ राज्य आघाडी स्थापन करण्यात आली होती. या संघटनेंतर्गत आतापर्यंत विदर्भ राज्यासाठी लढा देण्यात आला. परंतु केवळ आंदोलनमुळेच स्वतंत्र राज्य मिळत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.विदर्भ राज्य आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच जागा लढवणार नाही. ज्या जागांवर लढणे शक्य आहे; त्याच जागा लढवणार असल्याचे अ‍ॅड. अणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)...तर फेरविचार भाजपा व काँग्रेस हे दोघेही राजकीयदृष्ट्या आमच्यासाठी सारखेच पक्ष आहे. भाजपाने विदर्भ दिला तर पेढे वाटू. भाजपमध्ये एकाच माणसाची चालते ते म्हणजे नरेंद्र मोदी. परंतु ते दिल्लीत राहतात. त्यांना विदर्भ राज्य द्यायचे नाही, असे सांगून श्रीहरी अणे म्हणाले, भाजपाने दिल्लीत स्वतंत्र विदर्भाचा शासकीय ठराव आणला तर मात्र आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार करू.मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात अ‍ॅड. अणे यांना पत्रकारंनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना आरक्षण मिळायला हवे, परंतु आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे निकष तपासून पाहावे व त्यांना आरक्षण द्यावे. दुसरा मुद्दा अ‍ॅट्रॉसिटीचा आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा कधीकधी दुरुपयोग होतो, ही बाब खरी असली तरी एकच समाज सातत्याने जातीय अत्याचाराला बळी पडत आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.