शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

श्रीहरी अणेंचा नवा राजकीय पक्ष

By admin | Updated: September 25, 2016 01:22 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची शनिवारी घोषणा केली. या पक्षाची लवकरच राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येईल. यानंतर निवडणुका लढविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) लकडगंज येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी ही घोषणा करताना, आगामी स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले. १ मे २०१५ रोजी सिंदखेड राजा येथे विदर्भ राज्य आघाडी स्थापन करण्यात आली होती. या संघटनेंतर्गत आतापर्यंत विदर्भ राज्यासाठी लढा देण्यात आला. परंतु केवळ आंदोलनमुळेच स्वतंत्र राज्य मिळत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.विदर्भ राज्य आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच जागा लढवणार नाही. ज्या जागांवर लढणे शक्य आहे; त्याच जागा लढवणार असल्याचे अ‍ॅड. अणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)...तर फेरविचार भाजपा व काँग्रेस हे दोघेही राजकीयदृष्ट्या आमच्यासाठी सारखेच पक्ष आहे. भाजपाने विदर्भ दिला तर पेढे वाटू. भाजपमध्ये एकाच माणसाची चालते ते म्हणजे नरेंद्र मोदी. परंतु ते दिल्लीत राहतात. त्यांना विदर्भ राज्य द्यायचे नाही, असे सांगून श्रीहरी अणे म्हणाले, भाजपाने दिल्लीत स्वतंत्र विदर्भाचा शासकीय ठराव आणला तर मात्र आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार करू.मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात अ‍ॅड. अणे यांना पत्रकारंनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना आरक्षण मिळायला हवे, परंतु आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे निकष तपासून पाहावे व त्यांना आरक्षण द्यावे. दुसरा मुद्दा अ‍ॅट्रॉसिटीचा आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा कधीकधी दुरुपयोग होतो, ही बाब खरी असली तरी एकच समाज सातत्याने जातीय अत्याचाराला बळी पडत आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.