शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

बालगृहांबाबत लवकरच नवे धोरण

By admin | Updated: August 20, 2016 01:45 IST

राज्यातील बोगस बालगृहे आणि तेथील मुलांच्या पटपडताळणीच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि अनाथ बालकांना न्याय मिळावा, बालगृहांचा वसतिगृहाप्रमाणे उपयोग केला जाऊ नये

पुणे : राज्यातील बोगस बालगृहे आणि तेथील मुलांच्या पटपडताळणीच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि अनाथ बालकांना न्याय मिळावा, बालगृहांचा वसतिगृहाप्रमाणे उपयोग केला जाऊ नये, यासंदर्भातील नवे धोरण लवकरच आणणार असल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास आणि महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिली.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, ‘सध्या महाराष्ट्रातील बालगृहांमध्ये सुमारे ८०,००० मुले आहेत. इतर राज्यातील बालगृहांमध्ये ही संख्या साधारणपणे अडीच ते तीन हजारांच्या दरम्यान आहे. ज्या बालगृहांमध्ये प्रामाणिकपणे काम केले जाते, त्यांना संपूर्ण निधी मिळण्यासाठी महिला आणि बालविकास विभागातर्फे प्रयत्न केले जातात. गरीब, गरजू आणि अनाथ मुलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने बालगृहांची स्थापना करण्यात आली. बालगृहांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यादृष्टीने १२ विविध पोटकलम लावण्यात आले आहेत. या निकषांबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून उत्तर मिळाले आहे. त्यामुळे बालगृहांबाबत लवकरच नवे धोरण राबविले जाणार असून त्याबाबत बालहक्क आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे मागवण्यात आली आहेत.’ लैंगिक अत्याचारातील पीडित महिला आणि तरुणींच्या समुपदेशनासाठी राबवण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठीही सरकारतर्फे सकारात्मक प्रयत्न सुरु असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘राज्यातील विविध भागांच्या अनुशेषाप्रमाणे निधीचे वितरण केले जाते. अनुशेषाप्रमाणे विकासाला गती देत असताना कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही.’-पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री