शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

भाजपा कार्यकारिणीत नव्या चेह:यांना संधी

By admin | Updated: August 3, 2014 02:06 IST

पाच दिवसांत पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार असून, महाराष्ट्रातील नवीन चेह:यांना स्थान देण्यात येणार आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडीवर 9 ऑगस्टला राजधानीत होणा:या राष्ट्रीय परिषदेत सर्वसहमतीची मोहर उमटल्यानंतर, पाच दिवसांत पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार असून, महाराष्ट्रातील नवीन चेह:यांना स्थान देण्यात येणार आहे. 
215 जणांच्या सध्याच्या कार्यकारिणीत 12 जण महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, पूनम महाजन, एकनाथ खडसे, विनोद तावडे, किरीट सोमय्या, पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, शायना एन.सी, अजय संचेती हे सध्या कार्यकारिणीत आहेत. जावडेकर हे पक्षप्रवक्ते तर महाजन या राष्ट्रीय सचिव आहेत. 
 सूत्रने सांगितले,की राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नेमण्यात येणार होते, तीन दिवसांपूर्वी त्यांच्याशी चर्चाही झाली. मात्र राज्यात निवडणुका असल्याने त्यांनी नकार दिला आहे. आपल्याशी चर्चा झाली असून, आपण नकार दिल्याचे तावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यानंतर याच पदासाठी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव पुढे आले. भाजपातील गटबाजी त्यांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. 
  प्रकाश जावडेकर यांच्या जागेवर पक्षाचे मुख्यप्रवक्ते म्हणून विनय सहस्त्रबुद्धे यांना आणले जाऊ शकते. संघाने या नावाला पसंती दिली आहे. शायना एन.सी कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांचेही नाव प्रवक्त्यांच्या यादीत आहे. पूनम महाजन यांना पदोन्नती द्यावी असा एका गटाचा प्रयत्न सुरू आहे.  
पुण्यातील आमदार गिरीश बापट यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्याचा विचार संघ करीत आहे.    खजिनदार पीयूष गोयल राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या जागी महाराष्ट्रातून कोणालाही न घेता, हे पद  गुजरातच्या ताब्यात देण्यावर शहा यांचा भर आहे. तथापि, त्यांनाच या पदावर कायम ठेवावे यासाठी प्रयत्न होत आहेत. आता हा तिढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करूनच सुटणार    आहे. 
यापूर्वीच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून काही नावांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, मात्र  अंतिम निर्णय मोदी व शहा यांचाच असेल. कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यापूर्वी संघाचे मत घ्या, असे शहा यांना नागपूर भेटीत स्पष्टपणो सांगण्यात आल्याने गडकरी यांच्या शब्दाला बळ मिळण्याची शक्यता आहे.