शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

आदिवासींसाठी नवी वसतिगृहे उभारणार

By admin | Updated: October 5, 2016 05:20 IST

आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी पहाटे ५ वाजता मागे घेण्यात आले.

वसंत भोईर , वाडाआदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी पहाटे ५ वाजता मागे घेण्यात आले. २० हजार विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे उभारण्याची व त्यातील विद्यार्थ्यांकरिता असलेली डबा पद्धत बंद करून चांगल्या दर्जाचे भोजन देण्याची प्रमुख मागणी नाशिक विभागाचे आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव यांनी मान्य केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सहाही जिल्ह्यांतील प्रकल्प अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पुण्यात घेण्यात येईल, असा निर्णय या वेळी झाला. वनाधिकार योजनेची तातडीने अंमलबजावणी करून वंचित घटकांना लाभ देण्याचे मान्य करण्यात आले. ज्या मागण्या शासन स्तरावर आहेत त्यांच्यासाठी संबंधित मंत्र्यांसोबत येत्या आठवड्यात बैठक घेऊन हे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन आयुक्त जाधव यांनी शिष्टमंडळाला दिले.आदिवासींच्या वनजमिनीसंदर्भातील वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, बोगस आदिवासींवर कठोर कारवाई करा, वनजमिनी कसणाऱ्यांना हुसकावून लावण्याचे कारस्थान थांबवा, पेसा कायद्याची अंमलबजावणी करा, रोहयोची कामे तातडीने सुरू करा, भाताला हमीभाव द्या, आदिवासी बेघरांना घरकुले द्या, आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक व आश्रमशाळांची दुरवस्था दूर करा, वसतिगृहांच्या समस्या सोडवा या मागण्यांसाठी किसान सभेने सोमवारी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरांच्या वाड्यातील निवासस्थानासमोर ठिय्या दिला होता. आदिवासी विकास विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात दिवसभर चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांनी या दुय्यम अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास नकार दिल्याने आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली. प्रशासनाने गंभीर दखल घेत नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी तातडीने रात्रीच आंदोलनस्थळ गाठले. विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी माकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे सेक्रे टरी अजित नवले, स्टुडंट्स फेडरेशनचे दत्ता चव्हाण, डी.वाय.एफ.आय.चे वनशा दुमडा यांच्या शिष्टमंडळासोबत शासकीय विश्रामगृहात रात्री ११ वाजेपासून सलग चार तास चर्चा करून मागण्या मान्य केल्याने पहाटे हे आंदोलन मागे घेण्यात आले.