शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

सलोख्याचा नवा करार!

By admin | Updated: February 1, 2015 03:00 IST

समुद्रकिनाऱ्यावरचं गाव. हिंदू आणि मुस्लीम अशी दोन्ही समाजांची वस्ती. १९८७ साली काही कारणावरून तेढ निर्माण झाले आणि या दोन समाजांत दंगल झाली.

गावाने केली आचारसंहिता : संवेदनशील बुरोंडीचा पुरोगामी निर्णयशिवाजी गोरे - दापोलीसमुद्रकिनाऱ्यावरचं गाव. हिंदू आणि मुस्लीम अशी दोन्ही समाजांची वस्ती. १९८७ साली काही कारणावरून तेढ निर्माण झाले आणि या दोन समाजांत दंगल झाली. तेव्हापासून गाव संवेदनशील म्हणून नोंदलं गेलं. दोन्ही समाजांत अधूनमधून कुरबुरी सुरूच होत्या. त्याचे परिणाम दोन्ही बाजूंच्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोगायला लागले आणि त्या वेदनेतूनच उदय झाला तो एका नव्या सामाजिक कराराचा. दोन्ही समाजांनी एकत्र येत यापुढे एकोप्याने नांदण्यासाठी एक आचारसंहिता तयार केली अन् ती १०० वर्षे पाळण्याचा लेखी करारही केला़ जातीय सलोख्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारं हे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी (ता़ दापोली).बुरोंडी तसं डोंगरकपारीतील दाट लोकवस्तीचं गाव. गावात १९८७ साली हिंदू कोळी बांधवांची वरात मशिदीसमोरून जात असताना वरातीसमोर नाचण्यावरून दोन्ही समाजांत दंगल उसळली. या घटनेमुळे गावात धार्मिक तेढ निर्माण झाले. बुरोंडीचे सामाजिक कार्यकर्ते कै. युसूफभाई मस्तान आणि हिंदू पंचक्रोशी अध्यक्ष प्रदीप सुर्वे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजंूच्या लोकांची मने जुळविण्याचा प्रयत्न केला. त्याला तब्बल दोन वर्षे लागली. त्यानंतर हा वाद गावातील बैठकीत सामोपचाराने मिटविण्याचा निर्णय झाला. दोन्ही समाजांनी आपल्या चुका कबूल केल्या. तडजोडनामा कोर्टात सादर करून वाद मागे घेण्यात आला. त्यानंतर काही काळ गाव शांत होते; पण अधूनमधून छोट्या छोट्या घटना घडत होत्या़ २०१२ साली मशिदीसमोरील मोकळ्या जागेत गोविंदाची तिसरी फेरी सुरू असताना मुस्लीम तरुणाने हल्ला चढविला. त्यामुळे दोन्ही समाजांतील वातावरण चांगलेच तापले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या प्रकाराचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याआधी पोलिसांनी गावात समन्वय समिती नेमली. या समितीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील गोविंदा, गणपती, गौरी, ईद, इफ्तार पार्टी, उरूस, इत्यादी सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचा निर्णय झाला. २०१२च्या घटनेनंतर बुरोंडीचे सरपंच प्रदीप राणे यांनी इफ्तार पार्टीची प्रथा सुरू करून दोन्ही समाजांचीे मनं जुळविण्याचा प्रयत्न सुरू झाला़ नोव्हेंबर २0१४ मध्ये समन्वय समितीच्या बैठकीत सामाजिक सलोख्यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय झाला़ त्यानुसार मसुदा तयार करून त्यावर सर्व धर्मांतील प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या झाल्या अन् तो मसुदा १०० वर्षांसाठी लागू करण्यात आला. त्याच्या नोटरी केलेल्या प्रती सर्वांकडे ठेवण्यात आल्या आहेत.गावातील दोन्ही घटनांमुळे हे संवेदनशील गाव म्हणून गणले जाऊ लागले. गावाला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी आणि दोन्ही धर्मीयांचे मनोमिलन करण्यासाठी २०१२ पासून मुस्लीम बांधवांना इप्तार पार्टीची प्रथा गावात सुरू केली व दोन्ही समाजांचे मनोमिलन व्हायला सुरुवात झाली.- प्रदीप राणे, सरपंच जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक बसावी, बुरोंडी गावचा आदर्श देशाने घेतल्यास दोन्ही धर्मीयांतील सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल. दोन्ही धर्मीयांतील पुढील पिढी आमचा आदर्श नक्की घेईल.- प्रदीप सुर्वे, अध्यक्ष, समन्वय समिती हा करार म्हणजे दोन्ही समाजांसाठी शांतीचे शुभ प्रतीक आहे. काही किरकोळ गैरसमजांमधून मतभेद होतात. हे मानवतेला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणीही असाच आदर्श घेऊन आचारसंहिता तयार केली जावी व त्याचे पालन केले जावे.- महंमद साब दिवेकरअशी आहे आचारसंहिता़़़च्जातीय सलोख्याच्या आचारसंहितेची नोटरी करण्यात येऊन त्याच्या प्रती सर्वांकडे ठेवण्यात आल्या आहेत.च्हिंदू मिरवणुका, लग्न, गणपती उत्सव, पालखी या मशिदीजवळून जाताना वाजतगाजत जातील. परंतु नमाज चालू असेल तर नमाज होईपर्यंत कोणतीही मिरवणूक ठरावीक अंतरावर थांबेल, नमाज संपल्यानंतर पुढे जाईल.च्मुस्लीम समाजाच्या उरसाला मारुती मंदिर ते करजगाव दर्गा यामध्ये हिंदू समाजबांधव सहकार्य करतील.च्गोविंदा प्रथेप्रमाणे मशिदीजवळून नाचत जाईल, मात्र मशिदीसमोर अल्लाला मानवंदना म्हणून केवळ एकच फेरी मारेल. च्दोन्ही धर्मीयांचे सण एकोप्याने साजरे केले जातील. त्यासाठी कोणत्याही सणात दोन्ही बाजूंच्या समाजांनी एकमेकांना सहभागी करून घ्यायचे आहे.च्गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही समाजांतील लोकांना निमंत्रित केले जाईल आणि मानसन्मान दिला जाईल.