शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

कधीच काश्मीरमध्ये न राहिलेले देतायत काश्मिरी पंडितांसाठी लढा - नसीरुद्दीन शहांचा अनुपम खेरना टोला

By admin | Updated: May 28, 2016 11:48 IST

जी व्यक्ती (अनुपम खेर) कधीच काश्मिरमध्ये राहिलेली नाही, तीच व्यक्ती काश्मिरी पंडितांसाठी लढताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे, अशी टीका नसिरुद्दीन शहांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी त्यांचे सहकलाकार व अभिनेता अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधल्याने त्यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहे. अनुपम खेर हे काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना, खो-यातील त्यांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवताना दिसतात, त्याच मुद्यावरून शहा यांनी खेर यांच्यावर टीका केली आहे. ' जे लोक व्यक्ती (खेर) कधीच काश्मिरमध्ये राहिले नाहीत, तेच आता काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे' अशा शब्दांत नसीरुद्दीन शहा यांनी खेर यांच्यावर निशाणा साधला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलतान शहा यांनी खेर यांच्यावर टीका केली तसेच केंद्र सरकारबद्दलही टिपण्णी केली. 

आपल्याकडे लोक (जनता) कोणत्याही सरकारबाबत फार लवकर मतं बनवतात आणि निष्कर्ष काढतात, मात्र त्यांनी अशी घाई करू नये, आपण सरकारला आणखी (सिद्ध करण्यासाठी) वेळ देणं गरजेचं आहे, असे शहा यांनी म्हटले. मात्र शहा यांनी सरकारबाबत काहीप्रश्नही उपस्थित केले.  ज्याप्रमाणे काही पाठ्यपुस्तकांत, अभ्यासक्रमातील माहितीमध्ये काटछाट करून बदल करण्यात येत आहे, ते पाहून काळजी वाटते. मात्र देशाला अंधारयुगाकडे नेण्याइतपत हे सरकार मूर्ख नाही, असेही ते म्हणाले.  
दरम्यान अनुपम खेर यांनीही शहा यांच्या टीकेला ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. 'शाह साब की जय हो. या (तुमच्या) तर्कानुसार एनआरआय लोकांनी (अनिवासी भारतीय) तर भारताबाबत बिलकुल विचार करायलाच नको' असा टोला खेर यांनी ट्विटरवरून हाणला आहे.