शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीत शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: January 12, 2017 07:10 IST

स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा

कल्याण : स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा संपादित करून विमानतळ उभारले होते. मात्र, ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. त्याविरोधात बुधवारी सकाळी हजारो ग्रामस्थ व बाधित शेतकरी रस्त्यावर उतरले. नेवाळीनाका परिसरात शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करीत नौसेनेने उभारलेल्या राहुट्या (तंबू) उलथवून लावले. नौसेनेने कारवाई करण्यापूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. अन्यथा, हे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता होती. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. १९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. नेवाळी येथे विमानतळ होणार होते. मात्र, नियोजित विमानतळ नवी मुंबई येथे होत असल्याने आता नौसेनेला ही जागा कशासाठी हवी आहे, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी वर्षभरापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी तेथे गेल्या असता त्यांना ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आंदोलन करून पिटाळून लावले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा सर्वेक्षणाचा प्रयत्न फसला. आता पुन्हा नौसेनेने तेथे त्यांच्या राहुट्या उभारल्या. नौैसेनेच्या हालचाली पाहता बुधवारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, सर्वपक्षीय शेतकरी बचाव समितीचे मथूर म्हात्रे, चैनू जाधव, भाजपाचे राजेश पाटील, काँग्रेसचे अजय पाटील आणि शिवसेनेचे शुभम साळुंके यांनी तेथे धाव घेतली. नौसेनेच्या हालचालींना विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ जमले. आंदोलनकर्त्यांचे उग्र स्वरूप पाहता पालकमंत्री शिंदे यांनी तेथे धाव घेतली. पालकमंत्र्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त आंदोलकांनी नौसेनेच्या राहुट्या उखडून फेकून दिल्या. या वेळी नौसेना, राज्य राखीव पोलीस दल आणि शहर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. इतका मोठा बंदोबस्त असतानाही नौसेनेचे जवान या परिसरात हेलिकॉप्टरने घिरट्या घालून आंदोलनाचा अंदाज घेत होते. आंदोलकांनी राहुट्या उखडून फेकण्यास सुरुवात केली, तेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या जागा परत करा : पालकमंत्र्यांची मध्यस्थीपालकमंत्री शिंदे यांनी नौसेनेच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांना जमिनी परत केल्याशिवाय कोणते काम हाती घेऊ नका. हा प्रश्न केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे याआधीच मांडलेला आहे. सरकारकडे कागदपत्रे मागितली आहेत. शेतकऱ्यांनी कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी या वेळी केले. संरक्षणमंत्र्यांकडे बैठक बोलवून तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.