शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

नीरा-बारामती रस्ता की मृत्यूचा सापळा ?

By admin | Updated: April 7, 2017 01:10 IST

नीरा-बारामती रस्तावर वाहतूक वाढल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

सोमेश्वरनगर : नीरा-बारामती रस्तावर वाहतूक वाढल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यात आलेले वृक्ष, धोकादायक वळणे, चढ-उतार व रस्त्यालगतची वठलेली झाडे, हे नेहमीच अपघाताला आमंत्रण देत असतात. अनेक वेळा अपघात होऊनही बांधकाम विभाग मात्र याकडे डोळेझाक करत आहे. काही दिवसांपूर्वी रस्ता वाढला मात्र अपघात काही कमी झाले नाहीत. त्यामुळे निरा बारामती रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देण्यासारखे आहे. अनेक ठिकाणचे पुल अजूनही त्याच स्थितीत आहेत. रस्त्यालगतची अनेक झाडे ही जळाली असून ती कोणत्याही क्षणी वाहनचालकाच्या जिवावर बेतू शकतात. तसेच मागील काही दिवसात रस्त्याचे रूंदीकरण झाले मात्र हे रूंदीकरण करत असताना रस्त्यालगतची झाडे ही रस्त्यामध्ये आली आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण अजून वाढले. तसेच अनेक ठिकाणी साईट पट्ट्या खचल्या आहेत. निरा बारामती रस्त्यावरील कोऱ्हाळे जवळीत सर्वांत धोकादायक असे वळण म्हणून कठीण पुलाला ओळखले जाते. काही दिवसांपुर्वीच याठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र नीरा डाव्या कालव्यावरील पुल मात्र अरूंद आणि जुनाच आहे. तो बदलण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. या ठिकाणी अनेक वेळा एसटी बस व खाजगी वाहने पलटी झाल्याचे प्रकार घडले आहेत. बारामती वरून निरेकडे जात असताना या पुलाजवळ आल्यास समोरील रस्ताच दिसत नाही. त्यामुळे वळायचे कुठे हा प्रश्न वाहनचालकांना पडतो. रोजचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हा रस्ता नित्याचा बनला आहे. मात्र परगावावरून येणारे वाहनचालक हमखास या ठिकाणी फसतात. रात्रीच्या वेळी परगावातील वाहनांना या ठिकाणी हमखास अपघाताला समोरे जावे लागते. (वार्ताहर)>अनेक ठिकाणी वठलेले वृक्षनीरेपासून ते बारामतीपर्यंत रस्त्यालगतचे अनेक वृक्ष पुर्णत; वठून गेले. पूर्ण वृक्षच वाळला असून त्याला वाळवी लागली आहे. तो कोणत्याही क्षणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोसळू शकतात. वादळी वाऱ्यात हेच वृक्ष कोलमडून अनेक तास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मात्र संबंधित विभाग याकडे लक्षच देत नाही. त्याच बरोबर जेव्हा काही दिवसांपूर्वी नीरा ते कोऱ्हाळे या दरम्यान रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले त्यावेळी संबंधित ठेकेदाराने रस्ता मोठमोठया वृक्षांच्या बुंध्यापर्यंत केला काही वृक्ष तर अक्षरश: रस्त्यामध्येच आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.>पणदरे खिंडीतील चढण काढण्याची मागणीपणदरे खिंड-नीरा बारामती रोड जसा अस्तित्वात आला तेव्हापासून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पणदरे खिंड चांगलीच परिचित आहे. काही वर्षांपूर्वी रात्री नऊनंतर या खिंडीत प्रवाशांना अडवून लूटमारीचे प्रकार घडत होते. हे प्रकार अलीकडे कमी झाले आहे. मात्र या ठिकाणी दोन्हीकडील वाहनांना अजूनही डोंगर चढून रस्ता पार करावा लागतो. तसेच याठिकाणी अनेक वेडीवाकडे वळणे असून अनेक अपघातही झाले आहेत. संबंधित विभाग मात्र हा कडे लक्ष देत नाही. या ठिकाणाचा डोंगरावरील चढ त्वरित काढून टाकण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.