शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

कीर्तनातून नदी स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे गरजेचे - लोणीकर

By admin | Updated: May 13, 2016 19:50 IST

चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 13- चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी शासन राबवित असलेल्या या उपक्रमात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी वारकऱ्यांनी नदी स्वच्छतेबाबत त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करावे असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. चंद्रभागा नदी स्वच्छतेबाबत पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी येथील अर्बन बँकेच्या सभागृहात प्रमुख वारकऱ्यांसमवेत चर्चा केली यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुभाष देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, राजन पाटील, वारकरी संप्रदायाचे प्रकाश बोधले, माऊली महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांच्यासह अन्य वारकरी महाराज उपस्थित होते.पाणी पुरवठा मंत्री लोणीकर म्हणाले, पंढरपूरात येणारा वारकरी चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असल्याने ते पवित्र व स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक निधी शासन उपलब्ध करुन देणार आहे. तीर्थक्षेत्रांची ठिकाणी स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी शासन योजना राबवित आहे. या योजना केवळ शासनाच्या न राहता त्या लोकांना आपल्या वाटाव्यात आणि नदी स्वच्छ, पवित्र राहण्यासाठी त्यांनीही आपले योगदान द्यावे यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आणि प्रबोधनाचे हे काम वारकरी त्यांच्या कीर्तनातून चांगल्या प्रकारे करु शकतात असेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यावेळी म्हणाले. नदीचे पाणी दुषित होऊ नये यासाठी नमामी चंद्रभागा या कार्यक्रमातून चंद्रभागा नदीचे शुध्दीकरण करताना नदीकाठी घाट बांधण्याबरोबरच दशक्रिया विधीसारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. नदीत येणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेती किंवा उद्योगाला देण्यात येणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असल्याचेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले. पालकमंत्री देशमुख म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून वारकऱ्यांनीही या कामात आपले योगदान द्यावे. नदी स्वच्छतेचे हे पवित्र काम सर्वांच्या सहकार्यातून हे काम यशस्वी होणार आहे. यावेळी प्रकाश बोधले, जळगांवकर महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रभागा नदीचे पावित्र राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.