शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनातून नदी स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे गरजेचे - लोणीकर

By admin | Updated: May 13, 2016 19:50 IST

चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 13- चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी शासन राबवित असलेल्या या उपक्रमात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी वारकऱ्यांनी नदी स्वच्छतेबाबत त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करावे असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. चंद्रभागा नदी स्वच्छतेबाबत पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी येथील अर्बन बँकेच्या सभागृहात प्रमुख वारकऱ्यांसमवेत चर्चा केली यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुभाष देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, राजन पाटील, वारकरी संप्रदायाचे प्रकाश बोधले, माऊली महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांच्यासह अन्य वारकरी महाराज उपस्थित होते.पाणी पुरवठा मंत्री लोणीकर म्हणाले, पंढरपूरात येणारा वारकरी चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असल्याने ते पवित्र व स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक निधी शासन उपलब्ध करुन देणार आहे. तीर्थक्षेत्रांची ठिकाणी स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी शासन योजना राबवित आहे. या योजना केवळ शासनाच्या न राहता त्या लोकांना आपल्या वाटाव्यात आणि नदी स्वच्छ, पवित्र राहण्यासाठी त्यांनीही आपले योगदान द्यावे यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आणि प्रबोधनाचे हे काम वारकरी त्यांच्या कीर्तनातून चांगल्या प्रकारे करु शकतात असेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यावेळी म्हणाले. नदीचे पाणी दुषित होऊ नये यासाठी नमामी चंद्रभागा या कार्यक्रमातून चंद्रभागा नदीचे शुध्दीकरण करताना नदीकाठी घाट बांधण्याबरोबरच दशक्रिया विधीसारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. नदीत येणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेती किंवा उद्योगाला देण्यात येणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असल्याचेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले. पालकमंत्री देशमुख म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून वारकऱ्यांनीही या कामात आपले योगदान द्यावे. नदी स्वच्छतेचे हे पवित्र काम सर्वांच्या सहकार्यातून हे काम यशस्वी होणार आहे. यावेळी प्रकाश बोधले, जळगांवकर महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रभागा नदीचे पावित्र राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.