शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर अणुऊर्जा प्रकल्पांची गरज

By admin | Updated: December 1, 2014 00:13 IST

अनिल काकोडकर : विजेची गरज भागविण्यासाठी वीजनिर्मिती हवी

सातारा : देशाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याचप्रमाणे त्याच्या गरजाही वाढत आहेत. त्यामध्ये वीज ही महत्त्वाची गरज असून, त्यावर सर्व अवलंबून आहे. आगामी काळात देशात विजेची गरज भागविण्यासाठी दहा पट विजेची निर्मिती करावी लागणार आहे. विजेची गरज भागविण्यासाठी जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील,’ असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते साताऱ्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. काकोडकर म्हणाले, ‘सध्या भारताची लोकसंख्या एक अब्जच्या पुढे गेली असून, सध्या जी वीज निर्माण होत आहे. त्यापेक्षा सहा पट वीज आगामी काळात लागणार आहे. अणुऊर्जा हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. देशाला आगामी काळात अणुऊर्जाच तारणार असून, जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील. तरच विजेची गरज पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या बाबतीत प्रवासाचे उदाहरण घेतले तर जागतिक सर्वेक्षणानुसार विमान प्रवास करणे सुरक्षित मानले जाते. काही ठिकाणी याचे दुष्परिणाम जाणवले असतील; परंतु सगळ्याच ठिकाणी असे दुष्परिणाम होईत असे नाही. ज्याप्रमाणे एखादी विमान दुर्घटना झाली की नागरिक विमान प्रवास करणे सोडत नाहीत, त्या सारखाच हा प्रकार आहे. (प्रतिनिधी)शासनाने प्रश्न निकाली काढावामहाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत आपली सकारात्मक भूमिका आहे. सध्याचे स्त्रोत हे संपत आल्यामुळे अणुऊर्जा पुढील काळात महत्त्वाची ठरणार आहे. औष्णिक, जलविद्युत आणि कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेला मर्यादा पडतात. मात्र, अणुऊर्जेला कोणत्याही मर्यादा नसून, या उर्जेचा आपण कधीही आणि केव्हाही उपयोग करू शकतो. नव्या शासनाने या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.