शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

शंभर अणुऊर्जा प्रकल्पांची गरज

By admin | Updated: December 1, 2014 00:13 IST

अनिल काकोडकर : विजेची गरज भागविण्यासाठी वीजनिर्मिती हवी

सातारा : देशाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याचप्रमाणे त्याच्या गरजाही वाढत आहेत. त्यामध्ये वीज ही महत्त्वाची गरज असून, त्यावर सर्व अवलंबून आहे. आगामी काळात देशात विजेची गरज भागविण्यासाठी दहा पट विजेची निर्मिती करावी लागणार आहे. विजेची गरज भागविण्यासाठी जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील,’ असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते साताऱ्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. काकोडकर म्हणाले, ‘सध्या भारताची लोकसंख्या एक अब्जच्या पुढे गेली असून, सध्या जी वीज निर्माण होत आहे. त्यापेक्षा सहा पट वीज आगामी काळात लागणार आहे. अणुऊर्जा हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. देशाला आगामी काळात अणुऊर्जाच तारणार असून, जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील. तरच विजेची गरज पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या बाबतीत प्रवासाचे उदाहरण घेतले तर जागतिक सर्वेक्षणानुसार विमान प्रवास करणे सुरक्षित मानले जाते. काही ठिकाणी याचे दुष्परिणाम जाणवले असतील; परंतु सगळ्याच ठिकाणी असे दुष्परिणाम होईत असे नाही. ज्याप्रमाणे एखादी विमान दुर्घटना झाली की नागरिक विमान प्रवास करणे सोडत नाहीत, त्या सारखाच हा प्रकार आहे. (प्रतिनिधी)शासनाने प्रश्न निकाली काढावामहाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत आपली सकारात्मक भूमिका आहे. सध्याचे स्त्रोत हे संपत आल्यामुळे अणुऊर्जा पुढील काळात महत्त्वाची ठरणार आहे. औष्णिक, जलविद्युत आणि कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेला मर्यादा पडतात. मात्र, अणुऊर्जेला कोणत्याही मर्यादा नसून, या उर्जेचा आपण कधीही आणि केव्हाही उपयोग करू शकतो. नव्या शासनाने या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.