शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हवामानबदलाचा एकत्रित सामना गरजेचा : जावडेकर

By admin | Updated: May 21, 2016 00:56 IST

जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पुणे : सध्या संपूर्ण जगात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित १४२व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात जावडेकर शुक्रवारी बोलत होते. दीपक टिळक व्यासपीठावर होते.जावडेकर म्हणाले, ‘‘हवामानबदलाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक विकसित देशाची जबाबदारी असून देशानुसार ती बदलते. अनेक लोक आजही हवामानात झालेले बदल मान्य करायला तयार नाहीत. अनेक दिवसांपासून दुष्काळ, पूरस्थिती, सागरपातळीतील वाढ या गोष्टींची तीव्रता वाढत आहे.’’कार्बनडाय आॅक्सइड कमीत कमी प्रमाणात निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी प्रत्येक देशाने वाहनांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच कारखाने आणि कोळशापासून होणारी निर्मिती कमी करायला हवी. येत्या काळात वातावरणाची लढाई उत्तमरीतीने लढू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या शहरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यातही प्रत्येकांनी आपल्या स्तरावर वीज, पाण्याची बचत आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयात काम करायला हवे, असे जावडेकर म्हणाले.