शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

हवामानबदलाचा एकत्रित सामना गरजेचा : जावडेकर

By admin | Updated: May 21, 2016 00:56 IST

जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पुणे : सध्या संपूर्ण जगात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित १४२व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात जावडेकर शुक्रवारी बोलत होते. दीपक टिळक व्यासपीठावर होते.जावडेकर म्हणाले, ‘‘हवामानबदलाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक विकसित देशाची जबाबदारी असून देशानुसार ती बदलते. अनेक लोक आजही हवामानात झालेले बदल मान्य करायला तयार नाहीत. अनेक दिवसांपासून दुष्काळ, पूरस्थिती, सागरपातळीतील वाढ या गोष्टींची तीव्रता वाढत आहे.’’कार्बनडाय आॅक्सइड कमीत कमी प्रमाणात निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी प्रत्येक देशाने वाहनांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच कारखाने आणि कोळशापासून होणारी निर्मिती कमी करायला हवी. येत्या काळात वातावरणाची लढाई उत्तमरीतीने लढू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या शहरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यातही प्रत्येकांनी आपल्या स्तरावर वीज, पाण्याची बचत आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयात काम करायला हवे, असे जावडेकर म्हणाले.