शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

हवामानबदलाचा एकत्रित सामना गरजेचा : जावडेकर

By admin | Updated: May 21, 2016 00:56 IST

जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पुणे : सध्या संपूर्ण जगात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित १४२व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात जावडेकर शुक्रवारी बोलत होते. दीपक टिळक व्यासपीठावर होते.जावडेकर म्हणाले, ‘‘हवामानबदलाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक विकसित देशाची जबाबदारी असून देशानुसार ती बदलते. अनेक लोक आजही हवामानात झालेले बदल मान्य करायला तयार नाहीत. अनेक दिवसांपासून दुष्काळ, पूरस्थिती, सागरपातळीतील वाढ या गोष्टींची तीव्रता वाढत आहे.’’कार्बनडाय आॅक्सइड कमीत कमी प्रमाणात निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी प्रत्येक देशाने वाहनांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच कारखाने आणि कोळशापासून होणारी निर्मिती कमी करायला हवी. येत्या काळात वातावरणाची लढाई उत्तमरीतीने लढू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या शहरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यातही प्रत्येकांनी आपल्या स्तरावर वीज, पाण्याची बचत आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयात काम करायला हवे, असे जावडेकर म्हणाले.