शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’चा कायदा बदलण्याची गरज

By admin | Updated: October 27, 2015 02:03 IST

शेतकऱ्यांना ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार एफआरपी द्यावी लागेल, असा सरकार म्हणून आमचा आग्रह असला

मुंबई / कोल्हापूर : शेतकऱ्यांना ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार एफआरपी द्यावी लागेल, असा सरकार म्हणून आमचा आग्रह असला, तरी ती दोन-तीन टप्प्यांत कारखाने देणार असतील व त्यास शेतकऱ्यांनी वार्षिक सभेत मंजुरी दिली असल्यास, त्यासही सरकार हरकत घेणार नाही. यंदाच्या हंगामात तोच या प्रश्नातील मध्यम मार्ग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय चमूशी दिलखुलास गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील संपादकीय सहकारीही सहभागी झाले होते. त्यावेळी यंदाच्या हंगामातील कोंडी सरकार कसे फोडणार, या विषयीच्या प्रश्नास त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘एफआरपी’चा कायदा हा केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. तो आम्ही केलेला नाही. त्या कायद्यानुसार एफआरपी एकरकमी देणे बंधनकारक आहे, परंतु हा कायदा करताना त्यामध्ये एक मूलभूत चूक झाली आहे. उसाचा भाव गृहितकावर निश्चित केला जातो. तो बाजारातील साखरेचा भावाशी निगडित नाही. कोणत्याही अंतिम उत्पादनाच्या किमतीपेक्षा त्याच्या कच्च्या मालाची किंमत जास्त असू नये, एवढे किमान तत्त्वही पाळले गेलेले नाही. त्यामुळेच गेली दोन-तीन वर्षे एफआरपीचा गुंता निर्माण होत आहे. गतवर्षी बाजारातील साखरेचा भाव ३३०० रुपये क्विंटल असा गृहित धरून, त्यानुसार ऊसाची ‘एफआरपी’ निश्चित करण्यात आली, ती सरासरी २४०० रुपये होती. बाजारात प्रत्यक्षात साखरेचा भाव मात्र १९०० रुपयांपर्यंत खाली आला होता. पुढील वर्षी एफआरपीमध्ये आणखी शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे.देशात सर्वाधिक ९१ टक्के एफआरपी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी चांगली आहे व तिच्यावर सरकारचा वचक आहे, याचाच हा परिणाम आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘यंदाही एफआरपीचा प्रश्न निर्माण झाला आहे.’ शेतकरी हा कारखान्याचा मालक आहे. त्यामुळे वार्षिक सभेत ठराव करून दोन-तीन टप्प्यांत एफआरपी घेण्यास त्यांची तयारी असेल, तर सरकारला त्याबद्दल हरकतीचे कारण नाही. कायद्याने ती एकरकमी देणे बंधनकारकच असेल असे मत आहे, परंतु मधला मार्ग म्हणून हा विचार करावा लागेल. राज्यात काही कारखान्यांनी असे प्रयोग यंदा केले आहेत. (प्रतिनिधी)