शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

गोव्यात नदयांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसचाही तीव्र विरोध

By admin | Updated: September 30, 2016 18:45 IST

राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून या प्रश्नावर गोवा फॉरवर्डबरोबर राहू, असे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी जाहीर केले आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ३० : राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून या प्रश्नावर गोवा फॉरवर्डबरोबर राहू, असे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला.

पत्रकार परिषदेत डिसोझा म्हणाले की, यामुळे मच्छिमार संकटात येतील तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील. १८२ किलोमिटरचा नदी किनारी तटही केंद्र सरकारच्या अखत्यारित जाईल. मुरगांव पोर्ट ट्रस्टने आधीच बेतुल ते काणकोणपर्यंत सागरी कब्जा केला आहे. वास्कोत तर किनाऱ्यावर कोणतेही काम करायचे झाल्यास एमपीटीची परवानगी आधी घ्यावी लागते. अनेकदा एमपीटी आडमुठे धोरण घेते. आता तर राज्यातील सहा नद्या एमपीटीच्या ताब्यात जातील त्यामुळे लोकांना त्याचा बराच त्रास होणार आहे.

गोवा फॉरवर्डने या प्रश्नावर समविचारी पक्षाने एका व्यासपीठावर येण्याची जी हाक दिली आहे त्यास राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला असून आंदोलन उभरायचे झाल्यासही पक्ष गोवा फॉरवर्डबरोबर असेल, असे डिसोझा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दुरुस्ती विधेयक आणून सरकारने माड कापण्यासाठी मार्ग मोकळा केला, जमिनीही लाटल्या आता नद्याही आंदण द्यायला निघाले आहे. एमपीटीने मुरगांव बंदरात कोणतेही परवाने न घेता गाळ उपसण्याचे काम हाती घेतले तेव्हा राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेऊन स्थगिती आणावी लागली. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबाबत सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत दिले होते ते पाळलेले नाही. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करुन खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

नितीन गडकरींवर आरोप दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस अविनाश भोसले यांनी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल करताना हे ह्यआर्थिक राजकारणह्ण असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात उड्डाणपुलांच्या बाबतीत भ्रष्टाचार केल्याचा संशय असलेलेच आता गोव्यात स्वार्थासाठी नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यास पुढे सरसावले आहेत, असे भोसले म्हणाले. गोमंतकीय जनतेला विश्वासात न घेताच हा घाट घालण्यात आला, अशी टीका त्यानी केली. पत्रकार परिषदेस देवानंद नाईक, अभिजित धारगळकर, जॉर्ज बार्रेटो आदी पदाधिकारीही उपस्थित होते.