शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांना 'कलटी' देऊन दूर पळाला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 23, 2016 08:05 IST

भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून बघणा-यांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. 
 
छगन भुजबळांची भेट घेणे हे एक धाडसी पाऊल असून, त्यासाठी त्यांनी पंकजा मुंडे यांचे कौतुक केले आहे. प्रफुल्ल पटेल, पवार आणि सुनिल तटकरे यांनी यातून शिकले पाहिजे असे सल्लाही दिला आहे. ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना ‘कलटी’ देऊन दूर पळाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. 
 
आसाराम बापूंचा दाखला देऊन या अग्रलेखात न्यायदानाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लैांगिक शोषणाचा आरोप असलेले आसाराम बापू मागच्या चार वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याचवेळी गोव्याच्या एका आमदाराला भक्कम पुराव्याच्या आधारावर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पण आठवडयाभरातच त्याची जामिनावर सुटका झाली. गोव्याच्या आमदार महाशयांचे म्हणणे ऐकले जाते व त्यांची सुटका होते, पण आसाराम बापूंचे ऐकले जात नाही. या देशात एकाच गुन्ह्यासाठी दोन कायदे आहेत काय? की कुणाच्या मर्जीनुसार न्यायदेवता काम करते? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे? मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे. 
 
- छगन भुजबळ हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण सध्या ते ज्या अवस्थेतून जात आहेत त्याबद्दल आम्हाला माणूस म्हणून सहानुभूती आहे. भुजबळ यांनी शिवसेनेच्या तसेच शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीत जे अघोरी कृत्य केले त्याचा कोळसा आम्हाला इथे उगाळायचा नाही. त्या कर्माचे फळ त्यांना मिळालेच आहे, पण ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना ‘कलटी’ देऊन दूर पळाला आहे. म्हणूनच पंकजा मुंडे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन भुजबळांची चौकशी केली, प्रकृतीबाबत विचारपूस केली, या धाडसाचे आम्हाला कौतुक वाटते. 
 
- भुजबळ व आसाराम बापू हे बर्‍याच काळापासून तुरुंगात पडले आहेत. दोघांवरील गुन्हे आणि खटल्याचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे, पण आमची न्याययंत्रणा कायद्यानेच चालते की कुणाच्या इशार्‍यावर चालते याचा संशय येतो. गोव्यातील एका आमदार महाशयांवर बलात्कार, लैंगिक शोषणाचे आरोप पुराव्यांसह झाले. संबंधित पीडित मुलीने तसे पोलिसांना सांगितले. भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या आमदार महाशयांना अटक केली व फक्त आठवडाभरातच हे आमदार महाशय जामिनावर सुटून बाहेर आले. माझ्या विरोधकांनी मला संपविण्यासाठी कट रचल्याचे हे आमदार महाशय सांगतात. खरेखोटे न्यायदेवताच सांगेल, पण बलात्काराच्या आरोपाखालील आमदार महाशय बाहेर येऊन मोकाट सुटले. 
 
- आसाराम बापू हे चारेक वर्षे तुरुंगात पडले आहेत. त्यांच्यावर महिला भक्तांशी गैरवर्तन, त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे व त्यांचे जामिनाचे अर्ज रोज फेटाळले जात आहेत. ‘‘मला संपविण्याचा हा विरोधकांचा कट आहे,’’ असे आसाराम बापू सांगतात, पण गोव्याच्या आमदार महाशयांचे म्हणणे ऐकले जाते व त्यांची सुटका होते, पण आसाराम बापूंचे ऐकले जात नाही. या देशात एकाच गुन्ह्यासाठी दोन कायदे आहेत काय? की कुणाच्या मर्जीनुसार न्यायदेवता काम करते? डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आसाराम बापूंचा खटला चालवला व तेही हतबलतेने म्हणाले, ‘‘आसाराम बापू बाहेर येऊ नयेत असे काही लोकांना वाटते.’’ आता अशा काही लोकांच्या मर्जीवर न्यायदानाचे काम होणार आहे काय? आसाराम बापूंनी गुन्हा केला असेल तर त्याची कठोर शिक्षा ते भोगतील. येथे त्यांची बाजू घेण्याची गरज नाही. फक्त न्यायदानातील तफावत आम्ही दाखवत आहोत. 
 
- पंकजा मुंडे यांच्या पोटात कालवाकालव झाली तशी राष्ट्रवादीच्या तालेवार पुढार्‍यांच्या पोटात झाली नाही. भुजबळांच्या चांगल्या दिवसांत सगळेच ‘साहेब’, ‘भुजबळसाहेब’ म्हणून उदो उदो करीत होते. भुजबळांच्या राजकीय मंचावरील नाट्यमय भाषणांना व विधिमंडळातील ठोसेबाजीला दाद मिळत होती. भुजबळ फार्मवर पाहुणचाराच्या पंगती झडत होत्या, पण आज थकलेल्या व खंगलेल्या भुजबळांना कुणी भेटायला गेले नाही. पंकजा मुंडे जे.जे. रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा ‘‘यात ‘ओबीसी’चे काही राजकारण तर नाही ना?’’ अशा भुवया उंचावणार्‍यांचीही आम्हाला कीव वाटते. राजकारण गेले चुलीत, पण मला या ‘अंडा सेल’मधून बाहेर काढा अशा मानसिकतेत भुजबळ असावेत. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली भुजबळ ‘आत’ आहेत. आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. 
 
- पंकजा मुंडे भेटल्या हे त्यांचे धाडस. गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनीही अशीच हिंमत दाखवली असती. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे? मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे.