शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांना 'कलटी' देऊन दूर पळाला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 23, 2016 08:05 IST

भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून बघणा-यांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. 
 
छगन भुजबळांची भेट घेणे हे एक धाडसी पाऊल असून, त्यासाठी त्यांनी पंकजा मुंडे यांचे कौतुक केले आहे. प्रफुल्ल पटेल, पवार आणि सुनिल तटकरे यांनी यातून शिकले पाहिजे असे सल्लाही दिला आहे. ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना ‘कलटी’ देऊन दूर पळाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. 
 
आसाराम बापूंचा दाखला देऊन या अग्रलेखात न्यायदानाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लैांगिक शोषणाचा आरोप असलेले आसाराम बापू मागच्या चार वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याचवेळी गोव्याच्या एका आमदाराला भक्कम पुराव्याच्या आधारावर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पण आठवडयाभरातच त्याची जामिनावर सुटका झाली. गोव्याच्या आमदार महाशयांचे म्हणणे ऐकले जाते व त्यांची सुटका होते, पण आसाराम बापूंचे ऐकले जात नाही. या देशात एकाच गुन्ह्यासाठी दोन कायदे आहेत काय? की कुणाच्या मर्जीनुसार न्यायदेवता काम करते? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे? मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे. 
 
- छगन भुजबळ हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण सध्या ते ज्या अवस्थेतून जात आहेत त्याबद्दल आम्हाला माणूस म्हणून सहानुभूती आहे. भुजबळ यांनी शिवसेनेच्या तसेच शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीत जे अघोरी कृत्य केले त्याचा कोळसा आम्हाला इथे उगाळायचा नाही. त्या कर्माचे फळ त्यांना मिळालेच आहे, पण ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना ‘कलटी’ देऊन दूर पळाला आहे. म्हणूनच पंकजा मुंडे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन भुजबळांची चौकशी केली, प्रकृतीबाबत विचारपूस केली, या धाडसाचे आम्हाला कौतुक वाटते. 
 
- भुजबळ व आसाराम बापू हे बर्‍याच काळापासून तुरुंगात पडले आहेत. दोघांवरील गुन्हे आणि खटल्याचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे, पण आमची न्याययंत्रणा कायद्यानेच चालते की कुणाच्या इशार्‍यावर चालते याचा संशय येतो. गोव्यातील एका आमदार महाशयांवर बलात्कार, लैंगिक शोषणाचे आरोप पुराव्यांसह झाले. संबंधित पीडित मुलीने तसे पोलिसांना सांगितले. भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या आमदार महाशयांना अटक केली व फक्त आठवडाभरातच हे आमदार महाशय जामिनावर सुटून बाहेर आले. माझ्या विरोधकांनी मला संपविण्यासाठी कट रचल्याचे हे आमदार महाशय सांगतात. खरेखोटे न्यायदेवताच सांगेल, पण बलात्काराच्या आरोपाखालील आमदार महाशय बाहेर येऊन मोकाट सुटले. 
 
- आसाराम बापू हे चारेक वर्षे तुरुंगात पडले आहेत. त्यांच्यावर महिला भक्तांशी गैरवर्तन, त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे व त्यांचे जामिनाचे अर्ज रोज फेटाळले जात आहेत. ‘‘मला संपविण्याचा हा विरोधकांचा कट आहे,’’ असे आसाराम बापू सांगतात, पण गोव्याच्या आमदार महाशयांचे म्हणणे ऐकले जाते व त्यांची सुटका होते, पण आसाराम बापूंचे ऐकले जात नाही. या देशात एकाच गुन्ह्यासाठी दोन कायदे आहेत काय? की कुणाच्या मर्जीनुसार न्यायदेवता काम करते? डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आसाराम बापूंचा खटला चालवला व तेही हतबलतेने म्हणाले, ‘‘आसाराम बापू बाहेर येऊ नयेत असे काही लोकांना वाटते.’’ आता अशा काही लोकांच्या मर्जीवर न्यायदानाचे काम होणार आहे काय? आसाराम बापूंनी गुन्हा केला असेल तर त्याची कठोर शिक्षा ते भोगतील. येथे त्यांची बाजू घेण्याची गरज नाही. फक्त न्यायदानातील तफावत आम्ही दाखवत आहोत. 
 
- पंकजा मुंडे यांच्या पोटात कालवाकालव झाली तशी राष्ट्रवादीच्या तालेवार पुढार्‍यांच्या पोटात झाली नाही. भुजबळांच्या चांगल्या दिवसांत सगळेच ‘साहेब’, ‘भुजबळसाहेब’ म्हणून उदो उदो करीत होते. भुजबळांच्या राजकीय मंचावरील नाट्यमय भाषणांना व विधिमंडळातील ठोसेबाजीला दाद मिळत होती. भुजबळ फार्मवर पाहुणचाराच्या पंगती झडत होत्या, पण आज थकलेल्या व खंगलेल्या भुजबळांना कुणी भेटायला गेले नाही. पंकजा मुंडे जे.जे. रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा ‘‘यात ‘ओबीसी’चे काही राजकारण तर नाही ना?’’ अशा भुवया उंचावणार्‍यांचीही आम्हाला कीव वाटते. राजकारण गेले चुलीत, पण मला या ‘अंडा सेल’मधून बाहेर काढा अशा मानसिकतेत भुजबळ असावेत. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली भुजबळ ‘आत’ आहेत. आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. 
 
- पंकजा मुंडे भेटल्या हे त्यांचे धाडस. गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनीही अशीच हिंमत दाखवली असती. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे? मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे.