शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशव्यापी आंदोलन करणार - मुक्ता दाभोलकर

By admin | Updated: July 21, 2016 11:27 IST

हिंसेला नकार, मानवतेचा स्विकार हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. २० जुलै रोजी या आंदोलनाला दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 20 - हिंसेला नकार, मानवतेचा स्विकार हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. २० जुलै रोजी या आंदोलनाला दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात झाली असून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन २० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आज ३५ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या हत्येचा निषेध करण्यासाठी व दाभोलकर यांना महर्षी शिंदे पूलावर श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुक्ता दाभोलकर, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ३५ महिने होऊनही तपासयंत्रणा अतिशय संथगतीने काम करत आहेत. हत्या आणि खून असे प्रकार केवळ पाकिस्तान आणि बांग्लादेशात घडतात असे आतापर्यंत वाटत होते. मात्र आपल्या देशातही या गोष्टी सर्रास होत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. स्त्रीला सन्मानाने वागण्याचीही मुभा आपल्या देशात राहीली नाही हे कोपर्डीच्या प्रकरणावरुन आपल्याला दिसून येते. आपले कोणीही काहीही बिघडवू शकत नाही असा समज गुन्हेगारांमध्ये निर्माण होत आहे. आपला विरोध दर्शविण्यासाठी लोकशाहीमध्ये हिंसेचा मार्ग वापरणे हे अतिशय गैर आहे. या सर्व गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले, या सर्व प्रकरणामध्ये पोलिस आणि सीबीआयनी योग्य पद्धतीने तपास करणे गरजेचे आहे. कोपर्डीमधील बलात्कार प्रकरणाचाही त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. बलात्काऱ्याना जात-पात, धर्म काहीही नसते. त्यांची विकृत मानसिकता हेच या गुन्ह्याचे मूळ कारण आहे, ही मानसिकता बदलायला हवी. त्यामुळे केवळ कायदा व सुव्यवस्था करुन उपयोग नाही. पावसाळी अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाने डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीही विषय काढला नाही ही खेदाची बाब आहे. जागतिक पातळीवर हिंसेने थमौन घातले असताना अशा हत्यांचा प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारावा लागेल असे शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. या हत्येचा निषेध म्हणून पुढील एक महिना आपण केवळ एकच वेळ जेवण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मिलिंद देशमुख म्हणाले, डॉक्टरांचे मारेकरी शोधण्याचा यंत्रणेकडून केवळ देखावा होत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत संघटनेचा लढा चालूच राहील. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चित्रपट महोत्सव व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. अशाप्रकारच्या महोत्सवामुळे आजचा तरुण अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत नेमका काय विचार करतो हे यानिमित्ताने समोर येईल. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले.

सैैराट आता माझा राहीला नाही...भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा चौैधरी यांनी सैराटमुळे तरुण बिघडत असल्याने या चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी नुकतीच केली होती. त्यापार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांना विचारले असता ते म्हणाले, सैराट आता माझा राहीला नाही, तो आता जनतेचा झाला आहे. कोणत्याही कलेवर अशाप्रकारे बंदी घालून काहीही साध्य होणार नाही. मला जे वाटत होतं ते मी कलेच्या माध्यमातून समाजासमोर मांडले आहे.नागराज मंजुळे, दिग्दर्शक