शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास ठरावावेळी राष्ट्रवादी अनुपस्थित राहणार

By admin | Updated: October 28, 2014 01:51 IST

भाजपाचे नवे सरकार विधानसभेत विश्वासमताला सामोरे जाईल तेव्हा राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहतील,

शरद पवारांची भूमिका : बहुमतासाठी शिवसेनेच्या कुबडय़ांची भाजपाला गरज नाही
मुंबई : भाजपाचे नवे सरकार विधानसभेत विश्वासमताला सामोरे जाईल तेव्हा राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहतील, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे बहुमतासाठी शिवसेनेच्या कुबडय़ांची आता भाजपाला गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
आम्ही भाजपाला विश्वासदर्शक ठरावावेळी पाठिंबाही देणार नाही आणि विरोधही करणार नाही. आमचे सदस्य अनुपस्थित राहतील. सहा महिन्यांत राज्यावर पुन्हा निवडणूक लादायची नसेल आणि स्थिर सरकार द्यायचे असेल तर आमची भूमिका योग्यच आहे. भाजपा-शिवसेना एकत्र आले तर स्थिर सरकार देऊ शकतील; पण तशी शक्यता दिसत नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.  
पक्षातील फूट टाळण्यासाठी?
शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या काही मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी टाळण्यासाठी भाजपाला पाठिंबा देऊ केल्याची जोरदार चर्चा असताना आणखी एक कारण समोर आले आहे. भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊन पवार यांनी आपल्या पक्षातील संभाव्य फूट टाळल्याचे म्हटले जाते.
 
तेव्हा ‘ते’ झोपले होते का ?
आपण भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा-राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे; भ्रष्टाचाराप्रकरणी माजी मंत्र्यांचा बचाव करण्याची धडपड चालविल्याचा आरोप केला होता, यावर पवार म्हणाले, चव्हाण स्वत: पावणोचार वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते झोपले होते का?
 
पवारांची भूमिका दुर्दैवी
स्थिर सरकारच्या नावाखाली भाजपाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादीच्या खात्यांमधील गडबडींकडे  कानाडोळा केला नाही. उलट चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचाच प्रय} केला.