शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

विश्वास ठरावावेळी राष्ट्रवादी अनुपस्थित राहणार

By admin | Updated: October 28, 2014 01:51 IST

भाजपाचे नवे सरकार विधानसभेत विश्वासमताला सामोरे जाईल तेव्हा राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहतील,

शरद पवारांची भूमिका : बहुमतासाठी शिवसेनेच्या कुबडय़ांची भाजपाला गरज नाही
मुंबई : भाजपाचे नवे सरकार विधानसभेत विश्वासमताला सामोरे जाईल तेव्हा राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहतील, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे बहुमतासाठी शिवसेनेच्या कुबडय़ांची आता भाजपाला गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
आम्ही भाजपाला विश्वासदर्शक ठरावावेळी पाठिंबाही देणार नाही आणि विरोधही करणार नाही. आमचे सदस्य अनुपस्थित राहतील. सहा महिन्यांत राज्यावर पुन्हा निवडणूक लादायची नसेल आणि स्थिर सरकार द्यायचे असेल तर आमची भूमिका योग्यच आहे. भाजपा-शिवसेना एकत्र आले तर स्थिर सरकार देऊ शकतील; पण तशी शक्यता दिसत नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.  
पक्षातील फूट टाळण्यासाठी?
शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या काही मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी टाळण्यासाठी भाजपाला पाठिंबा देऊ केल्याची जोरदार चर्चा असताना आणखी एक कारण समोर आले आहे. भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊन पवार यांनी आपल्या पक्षातील संभाव्य फूट टाळल्याचे म्हटले जाते.
 
तेव्हा ‘ते’ झोपले होते का ?
आपण भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा-राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे; भ्रष्टाचाराप्रकरणी माजी मंत्र्यांचा बचाव करण्याची धडपड चालविल्याचा आरोप केला होता, यावर पवार म्हणाले, चव्हाण स्वत: पावणोचार वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते झोपले होते का?
 
पवारांची भूमिका दुर्दैवी
स्थिर सरकारच्या नावाखाली भाजपाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादीच्या खात्यांमधील गडबडींकडे  कानाडोळा केला नाही. उलट चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचाच प्रय} केला.