शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

भाजपच्या डावपेचाने राष्ट्रवादीच्या प. महाराष्ट्रातील गडाला धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:54 IST

- वसंत भोसले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला भारतीय जनता पक्षाच्या डावपेचाने जोरदार धक्का देत जवळपास उद्ध्वस्त ...

- वसंत भोसलेकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला भारतीय जनता पक्षाच्या डावपेचाने जोरदार धक्का देत जवळपास उद्ध्वस्त केला आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घातलेल्या उमेदवारीच्या घोळाने त्यात भर पडली आहे. भाजप-शिवसेना युतीने या गडावर आता वर्चस्व स्थापन केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह दहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि विधानसभेच्या ५८ जागा आहेत. या सर्वांवर नेहमीच सहकारी चळवळीच्या जोरावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वर्चस्व होते. भाजप आणि शिवसेना युतीने या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. त्याला आता पूर्ण यश आले नसले तरी हा गड हादरला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने अनुक्रमे सहा आणि चार जागा लढविल्या होत्या. मोदी लाटेत काँग्रेस सर्व जागांवर पराभूत झाली; मात्र राष्ट्रवादीने बारामती, कोल्हापूर, सातारा आणि माढा या चार जागा जिंकून आपले आव्हान अबाधित ठेवले होते. या निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेला घेण्यात आले. काँग्रेसने दोन, राष्ट्रवादीने सहा आणि स्वाभिमानी संघटनेने दोन जागा लढविल्या. त्यापैकी केवळ तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. उर्वरित सर्व जागांवर तीनही पक्ष पराभूत झाले. पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस पुन्हा एकदम हद्दपार झाली. यांच्या आघाडीत आलेल्या स्वाभिमानीलाही धक्का बसला व दहा वर्षे खासदार असलेले राजू शेट्टी यांनाही पराभव चाखावा लागला.

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा घोळ, उमेदवार ठरविताना केलेल्या कुरघोड्यांनी कार्यकर्ते हैराण होते. कॉँग्रेसने पुणे, सांगली व सोलापूरच्या जागा लढविण्याचा आग्रह धरला. सांगलीत उमेदवारच शेवटपर्यंत ठरला नाही. ती जागा स्वाभिमानीला देण्यात आली. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित होती. पुण्यातही कॉँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवार निश्चित केला.राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही माढा, मावळ, सातारा, कोल्हापूर या मतदारसंघांत उमेदवार निश्चित करताना घोळ घातले. अंतर्गत गटबाजीने स्वत: शरद पवार बेजार झाले होते. मावळमधून अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारसाठी आग्रह झाल्याने पवार कुटुंबीयात तणाव निर्माण झाला. परिणामी माढ्यातून स्वत: पवार यांना माघार घ्यावी लागली.

सातारामधून उदयनराजे यांना स्थानिक आमदारांचा विरोध होता. तो क्षमविण्यात पवारांची शक्ती खर्ची पडली. या पार्श्वभूमीवर भाजपचे विशेष लक्ष होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यांनी बारामतीतून दौंडचे आमदार सुभाष कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. माढ्यातून सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पक्षात ओढून उमेदवारी दिली. सोलापूरला मठातील स्वामींनाच आणून उभे केले. शिवसेनेने साताऱ्यात भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांना, तर राजू शेट्टी यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना उभे करून जातीचे गणित खेळले. सांगलीत काँग्रेसला अडचण निर्माण केल्याने राष्ट्रवादीनेही जागा ऐनवेळी स्वाभिमानीला देण्याचे ठरले. त्यांना उमेदवार नव्हता. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी लागली.

पवार कुटुंबीयातील दुसरा पराभवपश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व असणाºया शरद पवार यांच्या घराण्यातील दोन उमेदवार सुप्रिया सुळे (बारामती) आणि पार्थ पवार (मावळ) या निवडणुकीत उभे होते. पार्थ यांचा पराभव झाला. पवार कुटुंबीयातील चौथ्या पिढीचे पार्थ पवार हे प्रतिनिधी होते. हा पवार कुटुंबीयांचा दुसरा पराभव आहे. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी लोकल बोर्डाची निवडणूक जिंकली होती. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणुका लढविल्या आणि कधी हार पत्करली नाही. शरद पवार यांचे मोठे बंधू वसंतराव गोविंदराव पवार यांनी १९६० मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून शेकापकडून पोटनिवडणूक लढविली होती. सत्यशोधक चळवळीचे नेते केशवराव जेधे यांच्या निधनामुळे ही निवडणूक ९ फेब्रुवारी १९६० रोजी झाली. जेधे यांचे चिरंजीव काँग्रेसचे उमेदवार गुलाब जेधे यांनी त्यांचा पराभव केला होता. चार पिढ्यांमध्ये तो पहिला आणि पार्थ पवार यांचा दुसरा पराभव होय.

टॅग्स :baramati-pcबारामती