शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल पार्कमधील निसर्ग पर्यटन!

By admin | Updated: December 20, 2015 01:48 IST

मुंबई हे अन्य शहरांच्या तुलनेत एक अविश्रांत, न थांबणारं, नेहमीच धावणारं असं शहर आहे. लोकसंख्येची घनता मुंबईत सर्वांत जास्त आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे मुंबई

- संतोष सस्ते

मुंबई हे अन्य शहरांच्या तुलनेत एक अविश्रांत, न थांबणारं, नेहमीच धावणारं असं शहर आहे. लोकसंख्येची घनता मुंबईत सर्वांत जास्त आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे मुंबई शहराला फिल्टर करणारं नैसर्गिक यंत्रच मिळालं आहे. संपूर्ण जगात शहराला लागूनच घनदाट जंगल असणारं हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. वेगवेगळ्या प्रकारची जैविक विविधता येथे आढळते. उद्यानात ८00 प्रकारच्या वृक्षप्रजाती, ४0 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, २५0 पक्ष्यांच्या प्रजाती, ३८ सरपटणाऱ्या आणि उभयचरांच्या तसेच २00 फुलपाखरांच्या प्रजातीजाती आहेत. यावरून राष्ट्रीय उद्यानात वन्यजिवांचा जपण्यात आलेला वारसा आपणास लक्षात येतो.१९५0ला मुंबई राष्ट्रीय उद्यान कायद्यांतर्गत सुमारे २0 चौ. कि.मी. परिसरात कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली; तसेच १९६८ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने ६८.२७ चौ. कि.मी. इतक्या क्षेत्रफळाचे बोरीवली राष्ट्रीय उद्यान निर्माण करण्याची शिफारस केली. त्या शिफारशीनुसार १९७६ साली राज्य सरकारने मुंबई उपनगर व ठाणे जिल्हा यामध्ये विस्तारित असणाऱ्या बोरीवली राष्ट्रीय उद्यानाची घोषणा केली. १९८१ साली बोरीवली राष्ट्रीय उद्यानाचे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली’ असे नामकरण झाले. १९९६ साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १0३.८४ चौ. कि.मी. आहे.या ठिकाणी येणारे पर्यटक हे केवळ मनोरंजनासाठी किंवा साप्ताहिक सुटी घालवण्यासाठी येतात. या पर्यटकांचा कल वनराणी (मिनी ट्रेनसफारी), नौकाविहार, बालोद्यान इत्यादींकडे असतो. यात शाळांच्या सहली, प्रभातफेरी, कौटुंबिक सहली, ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम इत्यादींचा समावेश होत असतो. खरेतर, पार्कमध्ये निसर्ग पर्यटनासाठीचे असे व्यवस्थापन अपेक्षित असते. उद्यानात पर्यटकांसाठी व्याघ्र व सिंहविहार, निसर्ग पायवाट भ्रमण, वन्यजीव फोटोग्राफी स्पर्धा, वन्यजिवांवर आधारित चित्रकला स्पर्धा, पक्षी निरीक्षणसहली, लहान मुलांसाठी लिटल मोगलीसारखे उपक्रम राबवण्यात येत असतात. निसर्गाशी निगडित अशा कार्यशाळा घेतल्या जातात. पक्षी निरीक्षण व जंगल सफारीचे आयोजन केले जाते. तसेच माहिती केंद्रामध्ये विविध उपक्रमांद्वारे निसर्गाचे जतन व संरक्षणाची प्रेरणा दिली जाते. त्याचबरोबर कॅम्प शेड निर्माण करून पर्यटकांसाठी तंबू निवास येथे निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे निसर्गाबद्दल जागृती निर्माण व्हावी हा हेतू आहे. राष्ट्रीय उद्यान ही राष्ट्राची अमूल्य अशी नैसर्गिक संपत्ती आहे. तिचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. पर्यटकांनी पर्यटन करताना जंगलाचे संवर्धन मूल्य कमी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

(लेखक बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) आहेत.)