शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल पार्कमधील निसर्ग पर्यटन!

By admin | Updated: December 20, 2015 01:48 IST

मुंबई हे अन्य शहरांच्या तुलनेत एक अविश्रांत, न थांबणारं, नेहमीच धावणारं असं शहर आहे. लोकसंख्येची घनता मुंबईत सर्वांत जास्त आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे मुंबई

- संतोष सस्ते

मुंबई हे अन्य शहरांच्या तुलनेत एक अविश्रांत, न थांबणारं, नेहमीच धावणारं असं शहर आहे. लोकसंख्येची घनता मुंबईत सर्वांत जास्त आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे मुंबई शहराला फिल्टर करणारं नैसर्गिक यंत्रच मिळालं आहे. संपूर्ण जगात शहराला लागूनच घनदाट जंगल असणारं हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. वेगवेगळ्या प्रकारची जैविक विविधता येथे आढळते. उद्यानात ८00 प्रकारच्या वृक्षप्रजाती, ४0 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, २५0 पक्ष्यांच्या प्रजाती, ३८ सरपटणाऱ्या आणि उभयचरांच्या तसेच २00 फुलपाखरांच्या प्रजातीजाती आहेत. यावरून राष्ट्रीय उद्यानात वन्यजिवांचा जपण्यात आलेला वारसा आपणास लक्षात येतो.१९५0ला मुंबई राष्ट्रीय उद्यान कायद्यांतर्गत सुमारे २0 चौ. कि.मी. परिसरात कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली; तसेच १९६८ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने ६८.२७ चौ. कि.मी. इतक्या क्षेत्रफळाचे बोरीवली राष्ट्रीय उद्यान निर्माण करण्याची शिफारस केली. त्या शिफारशीनुसार १९७६ साली राज्य सरकारने मुंबई उपनगर व ठाणे जिल्हा यामध्ये विस्तारित असणाऱ्या बोरीवली राष्ट्रीय उद्यानाची घोषणा केली. १९८१ साली बोरीवली राष्ट्रीय उद्यानाचे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली’ असे नामकरण झाले. १९९६ साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १0३.८४ चौ. कि.मी. आहे.या ठिकाणी येणारे पर्यटक हे केवळ मनोरंजनासाठी किंवा साप्ताहिक सुटी घालवण्यासाठी येतात. या पर्यटकांचा कल वनराणी (मिनी ट्रेनसफारी), नौकाविहार, बालोद्यान इत्यादींकडे असतो. यात शाळांच्या सहली, प्रभातफेरी, कौटुंबिक सहली, ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम इत्यादींचा समावेश होत असतो. खरेतर, पार्कमध्ये निसर्ग पर्यटनासाठीचे असे व्यवस्थापन अपेक्षित असते. उद्यानात पर्यटकांसाठी व्याघ्र व सिंहविहार, निसर्ग पायवाट भ्रमण, वन्यजीव फोटोग्राफी स्पर्धा, वन्यजिवांवर आधारित चित्रकला स्पर्धा, पक्षी निरीक्षणसहली, लहान मुलांसाठी लिटल मोगलीसारखे उपक्रम राबवण्यात येत असतात. निसर्गाशी निगडित अशा कार्यशाळा घेतल्या जातात. पक्षी निरीक्षण व जंगल सफारीचे आयोजन केले जाते. तसेच माहिती केंद्रामध्ये विविध उपक्रमांद्वारे निसर्गाचे जतन व संरक्षणाची प्रेरणा दिली जाते. त्याचबरोबर कॅम्प शेड निर्माण करून पर्यटकांसाठी तंबू निवास येथे निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे निसर्गाबद्दल जागृती निर्माण व्हावी हा हेतू आहे. राष्ट्रीय उद्यान ही राष्ट्राची अमूल्य अशी नैसर्गिक संपत्ती आहे. तिचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. पर्यटकांनी पर्यटन करताना जंगलाचे संवर्धन मूल्य कमी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

(लेखक बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) आहेत.)