शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

By admin | Updated: July 29, 2016 17:52 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०१७ नंतर सुरू राहील अथवा नाही, याबाबत केंद्र सरकारने सुस्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत.

केंद्र सरकारची गाईडलाईन नाही : मार्च २०१७ पर्यंत कंत्राटपद्धतीने करारअमरावती, दि. २९ : राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०१७ नंतर सुरू राहील अथवा नाही, याबाबत केंद्र सरकारने सुस्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याचे संकेत आहेत.राष्ट्रीय आरोग्य अभियान केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली सुरूआहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालये स्थापिन करण्यात आले असून या अभियानावर जिल्हा शल्य चिकित्सकांचे नियंत्रण आहे. मात्र, हे अभियान राज्यात ३१ मार्च २०१७ नंतर सुरु राहील की नाही? याबाबत अद्यापही स्पष्ट धोरण प्राप्त झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

अभियान बंद झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभागात अगोदरच शेकडो पदे रिक्त असल्यामुळे आरोग्यसेवेवर मोठा परिणाम जाणवेल, हे वास्तव आहे. राज्यात आरोग्य अभियान हे सन २००५ मध्ये सुरु करण्यात आले. हा टप्पा सन २०१२ मध्ये संपुष्टात आला. या सात वर्षांच्या कालावधीत आरोग्यसेवा सर्वच स्तरावर पुरविण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्पा १ एप्रिल रोजी २०१२ रोजी सुरू झाला असून ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे.

हे अभियान सुरू ठेवायचे की नाही? याबाबत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहेग. मात्र, केंद्र सरकारकडून या अभियानाबाबत सुस्पष्ट धोरण निश्चित होत नसल्याने ३१ मार्च २०१७ नंतर राष्ट्रीय अभियान गुंडाळले जाते काय? याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय अभियानात राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांना ११ महिन्यांची पुनर्नियुक्ती दिली जाते.

परंतु सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे कंत्राट ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे तर दुसरीकडे या राष्ट्रीय अभियानाचा उद्देश पूर्ण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या अभियानाला मुदतवाढ मिळेल अथवा नाही? याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ३१ मार्च २०१७ नंतर पुनर्नियुक्ती द्यायची असल्यास त्यासाठी शुद्धिपत्रक काढून द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय अभियान सहसंचालक संजीव जाधव यांनी दिल्या आहेत.अशी आहे ८२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्तीराष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात एकूण ८२ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात लॅब टेक्निशियन, परिचारिका, फार्मासिस्ट, तालुका अकाऊंटंट, डाटा एन्ट्री आॅपरेटर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा लेखाधिकारी, समूह संघटक असे २२ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कामावर आधारित मोबदला पद्धतीने ६० हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. ३१ मार्च २०१७ नंतर पुनर्नियुक्ती न मिळाल्यास यासर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येईल, असे संकेत आहे.‘‘ राष्ट्रीय आरोग्य अभियानाबाबतचे नवे धोरण प्राप्त झाले नाही. मात्र, तसे काही असल्यास अंमलबजावणी केली जाईल. या अभियानात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत.- अरुण राऊत,शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय