शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या धरणांतून पूर्ण क्षमतेने विसर्ग

By admin | Updated: November 5, 2015 02:59 IST

सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार सकाळपर्यंत १,४२७ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे. पाटबंधारे खात्याने कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचे नियोजन केल्यामुळे १५ दिवसांत टप्पाटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे.नदीकाठच्या गावांमधील वीजपुरवठा खंडित करणे, पाणी चोरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबतच्या सूचना वीज व पोलीस खात्याला देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.गंगापूर धरणातून पाच दिवस तीन हजार क्युसेस व सात दिवस दोन हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दारणा समूहातूनही तीन, पाच व पंधरा दिवसांपर्यंत जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणातून पाणी सोडण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नकार देत, आंदोलन सुरू केल्यामुळे तूर्त गंगापूर व गौतमी गोदावरी या दोन धरणांतून पाणी सोडले जात आहे. कश्यपी धरणात ९४५ दशलक्ष घनफूट इतके पाणी आहे. जिल्हा प्रशासनाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबतचा आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, पाटबंधारे खात्याला पाण्याची गळती रोखण्याबाबत बजावले आहे. गोदाकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)बैठकीवर लोकप्रतिनिधींचा बहिष्कारधरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याने, त्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बोलविलेल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला, तसेच पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधींच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचे सुमारे १,५०० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे आ. निर्मला गावित यांनी सांगितले. महापौर अशोक मुर्तडक यांनी सध्या वीस टक्के पाणीकपात करण्यात आली असून, दहा महिन्यांत एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवताना नाशिकला मराठवाडा करू नका, असेही मुर्तडक म्हणाले.