शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बहरले नाशिकचे ‘आॅक्सिजन हब’

By admin | Updated: July 22, 2016 19:43 IST

शहरातील ‘आॅक्सिजन हब’ म्हणून ओळखले जाणारे वनविभागाचे जवाहरलाल नेहरु वनउद्यान वरुणराजाच्या कृपादृष्टीने बहरले आहे. येथील वनसंपदा जणू उन्हाळ्यानंतर पावसाच्या

- अझहर शेखनाशिक, दि.22 - शहरातील ‘आॅक्सिजन हब’ म्हणून ओळखले जाणारे वनविभागाचे जवाहरलाल नेहरु वनउद्यान वरुणराजाच्या कृपादृष्टीने बहरले आहे. येथील वनसंपदा जणू उन्हाळ्यानंतर पावसाच्या सरींमध्ये न्हाऊन निघाली असून उद्यानाचे सौंदर्य खुलले असून पर्यटकांना हे हिरवे सौंदर्य खुणावत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नेहरु वनउद्यान हे शहराचे निसर्गवैभव आहे. येथे भारतीय प्रजातीची दुर्मीळ वनसंपदा जोपासण्यात आली आहे. सध्यस्थितीत मोठ्या संख्येने येथे भारतीय प्रजातीची वनऔषधी असून डेरेदार वृक्षराजीमुळे शहराच्या एका दिशेने विकसीत जंगलाचे अस्तित्व आहे. अंबड औद्योगिक वसाहत, पालिकेचे खत प्रकल्प केंद्र यामुळे जणू शहरात पसरणारी प्रदुषित हवा हे जंगल नैसर्गिकरित्या शुध्द करुन पुढे पाठविण्याचे काम करत आहे. ताणतणावाच्या जीवनशैलीतून अल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी नाशिककरांना हे जवळचे हक्काचे ठिकाण आहे. ‘वीकेण्ड’ला नाशिककर ‘फ्रेश’ होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. निसर्गाच्या सानिध्यात वनभ्रमंतीची मजा पर्यटक तितक्याच आनंदाने लुटत आहे; सध्या वनविकास महामंडळाकडे वनउद्यानाचे नियंत्रण सोपविण्यात आल्याने मुख्य जबाबदारी वनविकास महामंडळावर टाकण्यात आली आहे केवळ देखभालीपुरते वनविभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहे. मुख्य प्रवेशद्वारावर वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवेश शुल्क प्रत्येकी व्यक्ती दहा रुपये व वाहन शुल्क दुचाकी (५० रुपये), चारचाकी (१०० रुपये) याप्रमाणे वसुल केले जात आहेत. प्रवेश शुल्काच्या तुलनेत वाहन शुल्क अधिक असल्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वनविभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या उद्यानात यापुर्वी सर्वांना मोफत प्रवेश दिला जात होता.नक्षत्रवृक्ष संकल्पना प्रकृती, स्वभाव, आयुष्य, रोग, उपचारासाठी आरोग्यदायी नक्षत्राक र्षक सवंदेना वाहक आराध्य वृक्षांची संकल्पना लक्षवेधी आहे. कुचला, आवळा, उंबर, कृष्णागुरू, नागकेशर, वड, पिंपळ, पारिजातक, सावर, राळ, मंदार, शमी, कदंब, मोह, कडुनिंब, अर्जुन अशा भारतीय प्रजातीची वृक्षसंपदा या उद्यानात आढळून येते.असा आहे इतिहासत्रिरश्मी डोंगराच्या सर्व बाजूंनी व्यापलेले वनक्षेत्र ९४ हेक्टरचे असून महामार्गालगतच्या सैम्य उतारावर वीस हेक्टर क्षेत्रात वनविभागाने त्रिरश्मी डोंगराच्या पायथ्याशी १९८५ साली पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान विकसित केले. हे उद्यान केवळ बगीचा आहे असे नाही, तर मानवाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारे व निसर्गप्रेम वाढविणारे उत्तम ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये नैसर्गिक विसावा दुर्मीळ होत चालला आहे. मनाला शांती देणारे आल्हाददायक वातावरण असलेले शहरापासून जवळचे एकमेव निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नेहरू वनोद्यान आहे. या उद्यानाला दिवसेंदीवस नाशिककरांसह आजूबाजूच्या शहरांमधील निसर्गप्रेमी नागरिकांचीही मोठी पसंती मिळू लागली आहे. त्याचप्रमाणे वनविभागाकडून आजपर्यंत सातत्याने वनोद्यानाच्या विकासासाठी केले जाणारे नावीन्यपूर्ण प्रयोग येथे येणाऱ्या नागरिकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे; -------विकासकामांना गतीमनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी या वनोद्यानात बॉटनिकल गार्डन साकारण्याची संकल्पना मांडली आहे. वनमंत्र्यांकडून या संकल्पनेला ‘ग्रीन सिग्नल’ही मिळाला आहे. टाटा ट्रस्टच्या विकासक म्हणून या ठिकाणी नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवून विविध विकासकामे करणार आहेत. या अंतर्गत उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक भव्य कमान उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे येथील बालोद्यानातही आकर्षक खेळण्या बसविण्याची तयारी केली जात आहे. एकूणच टाटा ट्रस्टच्या माध्यमातून बॉटनिकल उद्यान या संकल्पनेअंतर्गत विकासकामांना गती दिली जात आहे.वनऔषधींचा अनमोल ठेवावनोद्यानात सातत्याने विविध वनऔषधी रोपांची लागवड करण्यावर भर दिला जातो. भारतीय प्रजातीची वृक्ष मोठ्या संख्येने असून, बहुतांश वृक्षसंपदा ही औषधी गुणधर्माची आहे. सुमारे २०० हून अधिक वनऔषधींचा अनमोल ठेवा या वनोद्यानात जोपासला जात आहे. वृक्षांची ओळख व्हावी, म्हणून बुंध्यांजवळ फलक लावण्यात आले आहे.