ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १० - गुढीपाडव्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा पंचवटीतील जलकुंभातून पंचवटीकरांचे पिण्याचे पाणी रामकुंड सह इतर कुंडात सोडले गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गुरीवारी रात्री 12:30 ते आज सकाळी 9:00 वाजे पर्यंत पिण्याचे पाणी रामकुंडात सोडण्यात आल्यामुळे या जलकुंभातील पाण्याने लक्ष्मण कुंड,धनुष कुंड,रामकुंड सह दूतोंडया मारुती पर्यंतचे कुंड भरले.
विशेष म्हणजे म.न.पा शासन व प्रशासना च्या म्हणण्याप्रमाणे इंद्र कुंडातून व महापालिका विहरितून टॅंकरने पाणी आणून रामकुंड भरले जाणार होते परंतु तसे न करता पिण्याचे पाणी तेथे भरले गेले. दुष्काळी परिस्थितीत महापालिकेने केलेल्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.