शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

नंदादीप अखंड तेवत ठेवणारे माऊली!

By admin | Updated: February 19, 2015 01:56 IST

दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़

संजय जाधवल्ल पैठण (जि़ औरंगाबाद)दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़ मंदिरातील दिव्यांसाठी तेल पुरविता पुरविता लक्ष्मण मडके यांच्या कार्याची दखल घेत पैठणकरांनी त्यांना माऊली ही पदवी बहाल केली आहे. पैठण शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेले मंदिरे आहेत. यात ग्रामदैवत असलेले ढोलेश्वर महादेव मंदिर, गाढेश्वर महादेव, सिद्धेश्वर महादेव, पार्वती, सोमनाथ, इंद्रेश्वर, मल्लिनाथ, मुक्तेश्वर, नागनाथ, भैरवनाथ, उत्तरेश्वर, खोलेश्वर, पिंपळेश्वर, संगमेश्वर आदींसह अनेक महादेवांची मंदिरे आहेत. एकवीरा देवी, कालिका मंदिर, चिचाया मंदिर, सप्तमातृका मंदिर, पीठजा मंदिर, शनि भगवान मंदिर आदीसह अनेक शक्ती मंदिरे, गणेश मंदिरे आहेत. यादव काळात पैठणमध्ये शेकडो मंदिरे निर्माण झाली. यानंतरच्या काळात पैठणने एकनाथ, भानुदास, ज्ञानेश्वर, शिवदिननाथ, कृष्णदयार्णव, अमृतरायजी असे संत दिले. त्यांच्या काळात शहरात अनेक मठ व मंदिरे निर्माण झाली. यातील अनेक मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरात मूर्तीसमोर दिवा लावला जातो तो माऊलींच्या अथक प्रयत्नातूनच.तेलासाठी फेरीच्मंदिरातील दिव्यांना तेवत ठेवण्यासाठी तेल लागते़ प्रारंभीच्या काळात लक्ष्मण मडके स्वत:च्या घरून तेल आणून दिवा लावत. हे करता करता शहरातील इतर मंदिरांत दिवा लावावा, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली; परंतु हे परवडणारे नव्हते. च्यातून मार्ग काढताना त्यांनी शहरात फिरून यासाठी निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार आठवड्यातून दोन दिवस फेरी काढून व निधी जमा करून अनेक मंदिरात दिवे लावण्याचे कार्य त्यांनी सफल केले. जसजसा निधी वाढू लागला तशतशी मंदिराची संख्या वाढत गेली. अवघ्या काही दिवसांत त्यांचे हे कार्य समाजमान्य झाले. मंदिरात दिव्यांना तेल पुरवूनही निधी उरत होता.सन्याशी बुवाने मागितले वचनलक्ष्मण मडके साधारण तिशीत होते. तेव्हा ते शहराचे ग्रामदैवत ढोलेश्वर मंदिरात नियमित दर्शनासाठी जात असे. तेथे सेवेसाठी काशी येथून वृद्ध सन्यासी शंकरबुवा आलेले होते. त्यांनी लक्ष्मण यांना बोलावून मंदिरात तू जिवंत असेपर्यंत दिवा चालू ठेवशील असे मला वचन दे, असा प्रस्ताव ठेवला. त्यांनी शंकरबुवा या सन्याशाला तत्काळ वचन दिले, ते वर्ष होते १९७४. हे वचन ते आजही पाळत आहेत.