शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नंदादीप अखंड तेवत ठेवणारे माऊली!

By admin | Updated: February 19, 2015 01:56 IST

दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़

संजय जाधवल्ल पैठण (जि़ औरंगाबाद)दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़ मंदिरातील दिव्यांसाठी तेल पुरविता पुरविता लक्ष्मण मडके यांच्या कार्याची दखल घेत पैठणकरांनी त्यांना माऊली ही पदवी बहाल केली आहे. पैठण शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेले मंदिरे आहेत. यात ग्रामदैवत असलेले ढोलेश्वर महादेव मंदिर, गाढेश्वर महादेव, सिद्धेश्वर महादेव, पार्वती, सोमनाथ, इंद्रेश्वर, मल्लिनाथ, मुक्तेश्वर, नागनाथ, भैरवनाथ, उत्तरेश्वर, खोलेश्वर, पिंपळेश्वर, संगमेश्वर आदींसह अनेक महादेवांची मंदिरे आहेत. एकवीरा देवी, कालिका मंदिर, चिचाया मंदिर, सप्तमातृका मंदिर, पीठजा मंदिर, शनि भगवान मंदिर आदीसह अनेक शक्ती मंदिरे, गणेश मंदिरे आहेत. यादव काळात पैठणमध्ये शेकडो मंदिरे निर्माण झाली. यानंतरच्या काळात पैठणने एकनाथ, भानुदास, ज्ञानेश्वर, शिवदिननाथ, कृष्णदयार्णव, अमृतरायजी असे संत दिले. त्यांच्या काळात शहरात अनेक मठ व मंदिरे निर्माण झाली. यातील अनेक मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरात मूर्तीसमोर दिवा लावला जातो तो माऊलींच्या अथक प्रयत्नातूनच.तेलासाठी फेरीच्मंदिरातील दिव्यांना तेवत ठेवण्यासाठी तेल लागते़ प्रारंभीच्या काळात लक्ष्मण मडके स्वत:च्या घरून तेल आणून दिवा लावत. हे करता करता शहरातील इतर मंदिरांत दिवा लावावा, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली; परंतु हे परवडणारे नव्हते. च्यातून मार्ग काढताना त्यांनी शहरात फिरून यासाठी निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार आठवड्यातून दोन दिवस फेरी काढून व निधी जमा करून अनेक मंदिरात दिवे लावण्याचे कार्य त्यांनी सफल केले. जसजसा निधी वाढू लागला तशतशी मंदिराची संख्या वाढत गेली. अवघ्या काही दिवसांत त्यांचे हे कार्य समाजमान्य झाले. मंदिरात दिव्यांना तेल पुरवूनही निधी उरत होता.सन्याशी बुवाने मागितले वचनलक्ष्मण मडके साधारण तिशीत होते. तेव्हा ते शहराचे ग्रामदैवत ढोलेश्वर मंदिरात नियमित दर्शनासाठी जात असे. तेथे सेवेसाठी काशी येथून वृद्ध सन्यासी शंकरबुवा आलेले होते. त्यांनी लक्ष्मण यांना बोलावून मंदिरात तू जिवंत असेपर्यंत दिवा चालू ठेवशील असे मला वचन दे, असा प्रस्ताव ठेवला. त्यांनी शंकरबुवा या सन्याशाला तत्काळ वचन दिले, ते वर्ष होते १९७४. हे वचन ते आजही पाळत आहेत.