शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सागरी महामार्गाला अंतुले यांचे नाव द्या!

By admin | Updated: December 9, 2014 02:28 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा व विधान परिषदेचे माजी सदस्य भास्करराव शिंदे यांना विधिमंडळात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विधिमंडळात मागणी : अंतुले, देवरा, शिंदे यांना दोन्ही सभागृहांची श्रद्धांजली
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा व विधान परिषदेचे माजी सदस्य भास्करराव शिंदे यांना  विधिमंडळात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत या तिन्ही नेत्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.  या तिन्ही नेत्यांनी नेहमी जनतेलाच डोळ्यासमोर ठेवून कामे केली व राज्याला नवीन ओळख दिली होती. यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
बॅ.अंतुले यांच्यामुळेच राज्यात राज्यमंत्रिपद निर्माण झाले. शिवाय आमदारांचा मान वाढविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले होते असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ‘अंतुले पॅटर्न’ निर्माण झाला होता. ते तत्काळ निर्णय घ्यायचे. दुर्दम्य आत्मविश्वास, तडफदार नेतृत्व हे त्यांचे स्वभावगुण होते. त्यांच्यामुळेच सहकार चळवळीला राज्यात बळ मिळाले अशा भावना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मांडल्या. अंतुले यांच्या तडफदारपणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील प्रभावित झाले होते असे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले. सभापती शिवाजीराव देशमुख यांनीदेखील आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या नावाने शैक्षणिक संस्था निर्माण करण्याची सदस्यांची सूचना विचार करण्यासारखी आहे असे मत सभापतींनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या जाण्यामुळे मुत्सद्दी नेता, कुशल राजकारणी आणि सामान्यांचा आवाज हरवल्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे म्हणाले. देवरा हे प्रचंड मृदूभाषी होते व पक्षाच्या बाहेरदेखील त्यांचा प्रभाव होता या शब्दांत माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार म्हणून लौकिक असलेले भास्करराव शिंदे यांच्या निधनाने एका उत्कृष्ट नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांचे ‘माय फ्रेंड’ हे शब्द आजही लक्षात आहे असे मत सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार कपील पाटील, हेमंत टकले, भाई जगताप, निरंजन डावखरे, आनंद पाटील, जोगेंद्र कवाडे, मुझफ्फर हुसेन यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
नागपूर : कोकणचे ‘कॅलिफोर्निया’ करण्याचे स्वप्न सर्वात अगोदर माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनीच पाहिले होते. त्यामुळे कोकणच्या किनारपट्टीवर तयार होणा:या सागरी महामार्गाला अंतुले यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी विधिमंडळात सदस्यांनी केली. 
 
तटकरेंची नाराजी
शोकप्रस्तावावर आपले मत मांडत असताना सुनील तटकरे यांनी शासकीय शिथिलतेबाबत नाराजी व्यक्त केली. अंतुले यांचे 2 डिसेंबर रोजी सकाळी 1क् च्या सुमारास निधन झाले. परंतु शासकीय दुखवटा जाहीर करण्यासाठी शासनाला पाच तास लागले. असा प्रकार परत घडू नये असे ते म्हणाले.