शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नळपाणी योजनेचे काम १० वर्षांनंतरही अपूर्णच!

By admin | Updated: April 6, 2017 03:21 IST

तालुक्यातील बुधावली ग्रामपंचायत हद्दीतील काटी या गावाच्या नळपाणी योजनेचे काम गेली दहा वर्षे अपूर्णच असल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण सुरुच आहे

वसंत भोईर,वाडा- तालुक्यातील बुधावली ग्रामपंचायत हद्दीतील काटी या गावाच्या नळपाणी योजनेचे काम गेली दहा वर्षे अपूर्णच असल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण सुरुच आहे. येथे ‘भारत निर्माण वर्धित वेग’ या योजनेतून वर्ष २००७ - २००८ मध्ये नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यासाठी १५ लाख ८१ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन ग्रामपंचायत पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचे काम हाती घेतले होते. विहीर, पाण्याची टाकी, पंप हाऊस व काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली असून उर्वरीत कामे गेली दहा वर्षानंतरही अपूर्ण आहेत. झालेल्या कामासाठी ११ लाख ८६ हजारांचा खर्च करण्यात आला असतांनाही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा अद्यापही उतरलेला नाही. योजना वापरात नसल्याने पाईपलाईन खराब झाली आहे तसेच पाण्याच्या टाकीचीही दुरवस्था झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी याबाबत वाडा पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करून तत्कालीन ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. परंतू त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. >या पाणी योजनेबाबत नुकतीच सुनावणी घेण्यात आली असून संबंधितांना ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिचे काम लवकर पूर्ण न केल्यास कारवाई करण्यात येईल. - पी. एस .कुलकर्णी, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग वाडा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष संजय पाटील व सचिव सुनिता हरड यांना योजना पूर्ण करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात दिल्या होत्या. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. - पूनम दोंदे, ग्रामसेविका, बुधावली ग्रामपंचायत