शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नागपुरात उद्या ठिय्या होणारच!

By admin | Updated: November 29, 2014 01:39 IST

ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़

शरद जोशी यांचा इशारा : मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने निर्णय
नागपूर : शेतक:यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. पण शेतकरी समाधानी होतील असे कोणतेही ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़
नागपुरातील रामगिरी या मुख्यंमत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद जोशी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली़ बैठकीनंतर जोशी यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली़ चर्चेदरम्यान आम्ही मुख्यमंत्र्यांकडे शेतक:यांची दयनीय अवस्था मांडली व त्याला भरीव मदतीची गरज व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अडचणी सांगितल्या व शेतक:यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून, पुढच्या काळात त्यांच्या हितासाठी राबविणा:या योजनांची माहिती दिली. संघटनेने केलेल्या मागण्या केंद्र सरकारकडे पाठवू तसेच राज्य शासनाकडूनही त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. सरकार स्थापन होऊन फक्त एकच महिना झाला आहे. दोन दिवसांत या मागण्या पूर्ण करणो शक्य नाही. त्यामुळे यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पण कजर्माफी, वीजबिल माफ, शेतक:यांसाठी विशेष मार्शल प्लॅन याबाबत त्यांनी काहीच ठोस आश्वासन दिले नाही. शेतकरी समाधानी होतील असे त्यांच्याकडून काहीच पदरी न पडल्याने 3क् नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाल़े बैठकीत जोशी यांच्यासमवेत शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर आदी उपस्थित होते.
कापूस, सोयाबीन, धानाच्या हमी भावात वाढ, सरसकट सर्व शेतक:यांना कजर्माफी व वीजबिलमाफी,  शेतक:यांसाठी विशेष योजना (मार्शल प्लॅन),  शेतक:यांसाठी विशेष निधीची उभारणी आदी शेतकरी संघटनेच्या मागण्या आहेत. (प्रतिनिधी)
 
च्मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेच कापूस, सोयाबीन, भात, कजर्मुक्ती, 
वीजबिल मुक्ती आणि शेतमालाचे वाढीव भाव, स्वतंत्र विदर्भाची मागणी 
आदी मुद्दय़ांचा अंतर्भाव होता. 
च्विरोधी पक्षात असताना आमदार म्हणून फडणवीस यांनी याच मागण्या तत्कालीन सरकारकडे केल्या होत्या. याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्याला त्यांनी सहमतीही दर्शविली. 
 
मुख्यमंत्र्यांनी 
दिलेली आश्वासने
च्शेतक:यांसाठी सौरपंपाची योजना
च्हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी सौर कुंपण
च्दुष्काळी भागासाठी वीजबिल, कर्ज माफी
च्सर्पदंश झाल्याने शेतकरी दगावल्यास आर्थिक मदत