शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नागपुरात उद्या ठिय्या होणारच!

By admin | Updated: November 29, 2014 01:39 IST

ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़

शरद जोशी यांचा इशारा : मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने निर्णय
नागपूर : शेतक:यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. पण शेतकरी समाधानी होतील असे कोणतेही ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़
नागपुरातील रामगिरी या मुख्यंमत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद जोशी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली़ बैठकीनंतर जोशी यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली़ चर्चेदरम्यान आम्ही मुख्यमंत्र्यांकडे शेतक:यांची दयनीय अवस्था मांडली व त्याला भरीव मदतीची गरज व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अडचणी सांगितल्या व शेतक:यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून, पुढच्या काळात त्यांच्या हितासाठी राबविणा:या योजनांची माहिती दिली. संघटनेने केलेल्या मागण्या केंद्र सरकारकडे पाठवू तसेच राज्य शासनाकडूनही त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. सरकार स्थापन होऊन फक्त एकच महिना झाला आहे. दोन दिवसांत या मागण्या पूर्ण करणो शक्य नाही. त्यामुळे यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पण कजर्माफी, वीजबिल माफ, शेतक:यांसाठी विशेष मार्शल प्लॅन याबाबत त्यांनी काहीच ठोस आश्वासन दिले नाही. शेतकरी समाधानी होतील असे त्यांच्याकडून काहीच पदरी न पडल्याने 3क् नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाल़े बैठकीत जोशी यांच्यासमवेत शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर आदी उपस्थित होते.
कापूस, सोयाबीन, धानाच्या हमी भावात वाढ, सरसकट सर्व शेतक:यांना कजर्माफी व वीजबिलमाफी,  शेतक:यांसाठी विशेष योजना (मार्शल प्लॅन),  शेतक:यांसाठी विशेष निधीची उभारणी आदी शेतकरी संघटनेच्या मागण्या आहेत. (प्रतिनिधी)
 
च्मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेच कापूस, सोयाबीन, भात, कजर्मुक्ती, 
वीजबिल मुक्ती आणि शेतमालाचे वाढीव भाव, स्वतंत्र विदर्भाची मागणी 
आदी मुद्दय़ांचा अंतर्भाव होता. 
च्विरोधी पक्षात असताना आमदार म्हणून फडणवीस यांनी याच मागण्या तत्कालीन सरकारकडे केल्या होत्या. याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्याला त्यांनी सहमतीही दर्शविली. 
 
मुख्यमंत्र्यांनी 
दिलेली आश्वासने
च्शेतक:यांसाठी सौरपंपाची योजना
च्हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी सौर कुंपण
च्दुष्काळी भागासाठी वीजबिल, कर्ज माफी
च्सर्पदंश झाल्याने शेतकरी दगावल्यास आर्थिक मदत