शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उद्या ठिय्या होणारच!

By admin | Updated: November 29, 2014 01:39 IST

ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़

शरद जोशी यांचा इशारा : मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने निर्णय
नागपूर : शेतक:यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. पण शेतकरी समाधानी होतील असे कोणतेही ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़
नागपुरातील रामगिरी या मुख्यंमत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद जोशी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली़ बैठकीनंतर जोशी यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली़ चर्चेदरम्यान आम्ही मुख्यमंत्र्यांकडे शेतक:यांची दयनीय अवस्था मांडली व त्याला भरीव मदतीची गरज व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अडचणी सांगितल्या व शेतक:यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून, पुढच्या काळात त्यांच्या हितासाठी राबविणा:या योजनांची माहिती दिली. संघटनेने केलेल्या मागण्या केंद्र सरकारकडे पाठवू तसेच राज्य शासनाकडूनही त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. सरकार स्थापन होऊन फक्त एकच महिना झाला आहे. दोन दिवसांत या मागण्या पूर्ण करणो शक्य नाही. त्यामुळे यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पण कजर्माफी, वीजबिल माफ, शेतक:यांसाठी विशेष मार्शल प्लॅन याबाबत त्यांनी काहीच ठोस आश्वासन दिले नाही. शेतकरी समाधानी होतील असे त्यांच्याकडून काहीच पदरी न पडल्याने 3क् नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाल़े बैठकीत जोशी यांच्यासमवेत शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर आदी उपस्थित होते.
कापूस, सोयाबीन, धानाच्या हमी भावात वाढ, सरसकट सर्व शेतक:यांना कजर्माफी व वीजबिलमाफी,  शेतक:यांसाठी विशेष योजना (मार्शल प्लॅन),  शेतक:यांसाठी विशेष निधीची उभारणी आदी शेतकरी संघटनेच्या मागण्या आहेत. (प्रतिनिधी)
 
च्मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेच कापूस, सोयाबीन, भात, कजर्मुक्ती, 
वीजबिल मुक्ती आणि शेतमालाचे वाढीव भाव, स्वतंत्र विदर्भाची मागणी 
आदी मुद्दय़ांचा अंतर्भाव होता. 
च्विरोधी पक्षात असताना आमदार म्हणून फडणवीस यांनी याच मागण्या तत्कालीन सरकारकडे केल्या होत्या. याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्याला त्यांनी सहमतीही दर्शविली. 
 
मुख्यमंत्र्यांनी 
दिलेली आश्वासने
च्शेतक:यांसाठी सौरपंपाची योजना
च्हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी सौर कुंपण
च्दुष्काळी भागासाठी वीजबिल, कर्ज माफी
च्सर्पदंश झाल्याने शेतकरी दगावल्यास आर्थिक मदत