शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

विश्वास देणे माझी जबाबदारी

By admin | Updated: July 22, 2016 00:58 IST

जनक्षोभ शांत करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.

पुणे : कोपर्डीमधील दुर्दैवी घटनेनंतर उसळलेला जनक्षोभ शांत करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना आरोपीला लवकरात लवकर आणि कडक शिक्षा होण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला आहे. गावातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला असून, एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. कोपर्डीतील घटना अतिशय दुर्दैवी आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अत्यंत क्रूरपणे हे नराधमी कृत्य करण्यात आलेले आहे. गावामध्ये संताप आहे; मात्र नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वास दिला आहे. गावामध्ये पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षकांना दिलेले आहेत. घटना घडल्यानंतर शाळांमधली मुलींची उपस्थिती कमी झाली होती; मात्र आपण भेट दिली तेव्हा शाळांमध्ये मुली मोठ्या संख्येने हजर होत्या. शाळांमध्ये जाऊन शुक्ला यांनी मुलींशी संवाद साधला आहे. छेडछाडीचे प्रकार घडल्यास पालकांना आणि पोलिसांना न घाबरता सांगण्याचे आवाहनही त्यांनी कोपर्डीतील विद्यार्थिनींना केले. त्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक नागरिकांना देऊन त्यावर एसएमएस करण्यास सांगितले आहे. जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्याचे शुक्ला म्हणाल्या. पुण्यामध्येही शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात येत आहे. नुकतीच प्राचार्यांची एक बैठक घेऊन अशा घटना घडत असतील तर त्या घटनांबाबत पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोपींना पाठीशी घालून त्यांची हिंमत वाढवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोपर्डीतील घटनेचा तपास जिल्हा पोलीस करीत आहेत. त्यावर पोलीस महानिरीक्षकांचे लक्ष आहे. आपण तपासाचा भाग नसल्याचे तसेच केवळ लोकांमधला विश्वास वाढवून तेथील वातावरण पुन्हा पूर्वपदावर आणण्याची आपली जबाबदारी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.