शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मायमराठीसाठी!

By admin | Updated: February 27, 2017 11:21 IST

आज 27 फेब्रुवारी! मराठी राजभाषा दिन. सालाबादप्रमाणे मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने आज काही शासकीय कार्यक्रमांचे आयोजन होईल,

 
बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ -  आज 27 फेब्रुवारी! मराठी राजभाषा दिन. सालाबादप्रमाणे मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने आज काही शासकीय कार्यक्रमांचे आयोजन होईल, सोशल मीडियावरही अगदी परवापासूनच मराठी दिनाच्या आगावू शुभेच्छा देणारे मेसेज फिरू लागले आहेत. तसे व्हॉट्स अॅप आल्यापासून अशा शुभेच्छांचा सुळसुळाट झालेला आहेच म्हणा.  त्यामुळे अशा शुभेच्छांमागे मराठीविषयी आत्मियता किती आणि औपचारिकता किती हा संशोधनाचाच विषय ठरावा. असो, 
 मराठी माणूस, मराठी भाषा यांचे संवर्धन हा आजच्या काळातील कळीचा विषय बनला आहे.  मराठी मरतेय, तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे म्हणून आमच्यापैकी बरेचजण गळे काढत असतात, पण प्रत्यक्षात आपला मायबोलीसाठी कुणीच काही करत नाही. खेदाची बाब म्हणजे आज जागतिकीकरण आणि इंग्रजी व हिंदी भाषांच्या आक्रमणासमोर मराठी भाषा ही मराठी माणसाला ओझं वाटू लागली आहे, की काय अशी शंका येते. दुर्दैवाने मराठीविषयी मराठी माणसाच्याच मनात न्यूनगंड निर्माण झालाय! कार्यालयीन ठिकाणी सोडा पण आपापसात बोलतानाही मराठीत बोलणे मराठीजनांस कमीपणाचे वाटू लागलेय! सर्वात कहर म्हणजे आजच्या आया (सॉरी मॉम्स)
आपल्या वर्षा दोन वर्षाँच्या कोवळ्या लेकरांशीही बोबल्या इंग्रजीतून संवाद साधू लागल्या आहेत. बाकी फेसबुक, वॉटसअॅपवरही आपली 'पत' वाढवण्यासाठी इंग्रजीचा बेसुमार वापर करणारे बरेचजण आहेतच! आता अशाने मराठीचे संवर्धन कसे काय होणार? 
बरं स्वतःला मराठीचे रक्षणकर्ते समजणारे साहित्यिक, शिक्षक, राजकारणी यांची परिस्थितीही वेगळी नाही. मराठीच्या संगोपन, संवर्धनापेक्षा नसते वाद उकरण्यात यांना अधिक रस. त्यातूनच मग मराठीप्रेम व्यक्त करण्यासाठी दोन चार भैयांना झोडपले जाते. तोडफोड होते, गुजराती, मद्राशी यांच्यावर टीका केली जाते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, मराठी माणसाचे खच्चीकरण होत असल्याची भीती व्यक्त केली जाते, पण त्यातून मायमराठीला कितीसा आणि फायदा होणार? 
एकीकडे मराठी शाळा बंद पडताहेत म्हणून रडायचे आणि स्वतःच्या लेकरांना कॉन्व्हेंटमध्ये घालायचे, सभेत मराठीवर व्याख्यान झोडायचे आणि घरी, मित्रमंडळीत इंग्रजीतून गप्पा मारायच्या, वर मराठी ही ज्ञानभाषा नाही, जागतिक पातळीवर तिची फार पत नाही म्हणून नावे ठेवायची हे यांचे मराठीप्रेम! 
(शासकीय संकेतस्थळांना मराठीचे वावडे!)
(संगणकावर मराठीला प्राधान्य द्या)
(राज्य मराठी विकास संस्थेला पूर्णवेळ संचालक मिळेना!)
  •  
 
 
 
सध्या साहित्य आणि पत्रकारितेत बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यावरून वाद घातला जातोय. त्यातला एक गट बोलीभाषेसाठी आग्रही आहे, तर दुसरा प्रमाणभाषेसाठी. पण भाषा प्रवाही राहण्यासाठी भाषेत नवनवीन शब्द आलेच पाहिजेत, पण त्याचा अतिरेक होऊ नये!
एवढं वाचल्यावर आता तुम्ही म्हणाल, मग मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करता येईल? खरंतर मराठीच्या रक्षणासाठी संवर्धनासाठी मोठं भव्यदिव्य काहीतरी करण्याची गरज नाही. केवळ आपापसांत मराठीतून संवाद साधल्याने, राज्यातील व्यवहारात, शासकीय कारभारात मराठीला अधिक चालना दिल्यास मराठीचा वापर वाढेल. आजच्या काळात इंग्रजीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. पण म्हणून आपल्या मुलांशी विनाकारण इंग्रजीतून संवाद साधण्याचीही गरज नाही. मातृभाषा ही शिक्षणाचा पाया असतो. ज्याचा हा पाया पक्का असेल तो पुढे कुठलीही भाषा आत्मसात करू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सुळसुळाट झाला असताना शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिशचा पर्याय उपलब्ध केल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकेल. कार्यालयीन कामकाजात, रोजच्या प्रवासात, फुटपाथवरच्या परप्रांतीय व्यापा-यापासून ते लोकलमधल्या भांडणांपर्यंत आणि फेसबूकवरच्या स्टेटसपासून व्हॉट्सअॅपवरच्या गप्पांपर्यंत जेवढा मराठीचा वापर होईल, तेवढी मराठी वाढेल. हे खूप सोप्प आहे, पण मनावर कोण घेणार???