शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात जमीन खरेदीनंतर तीन दिवसांत म्युटेशन

By admin | Updated: September 2, 2016 18:14 IST

राज्यात यापुढे कुणीही जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीची सब-रजिस्ट्रारकडे नोंदणी झाल्यानंतर तीन दिवसांत म्युटेशनची प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक झाले आहे

- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 2 - राज्यात यापुढे कुणीही जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीची सब-रजिस्ट्रारकडे नोंदणी झाल्यानंतर तीन दिवसांत म्युटेशनची प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक झाले आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
 
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. 1969 सालच्या गोवा, दमण व दिव भू-संहितेच्या नियमांमध्ये आता दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या दुरुस्तीनुसार कुणीही जमीन खरेदीची नोंदणी केल्यानंतर सब-रजिस्ट्रार स्वत:च त्याबाबतची माहिती संबंधित मामलेदारांकडे पाठवतील व म्युटेशनची प्रक्रिया सुरू करण्यास सांगतील. सब-रजिस्ट्रारनी म्युटेशनचे किती प्रस्ताव मामलेदारांकडे पाठवले याविषयीची नोंद ऑनलाईन पद्धतीने ठेवली जाईल. जो प्रस्ताव अगोदर येईल, त्या प्रस्तावाबाबतची प्रक्रिया मामलेदारांना अगोदर सुरू करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे म्युटेशन प्रक्रिया अडून उरण्याचे प्रकार होणार नाहीत. लोक अगोदर जमीन खरेदी केल्यानंतर बरीच वर्षे म्युटेशनही करत नव्हते. त्यामुळे एक चौदाच्या उता:यावर जुनीच नावे उरायची व एकच जमीन दोघांना विकण्याचेही प्रकार घडायचे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
 
160 कोटींचा रोप-वे
रेईश मागूश ते कांपाल असा रोप वे प्रकल्प यापुढे उभा केला जाणार आहे. याबाबतचे कंत्रट काश्मिरमधील मेनूस अॅडव्हेंचर्स प्रा. लिमिटेड या कंपनीला द्यावे व गोवा पर्यटन विकास महामंडळाने या कंपनीशी करारावर सही करावी, असाही प्रस्ताव मंत्रिमंडळाने संमत केला. नेरूल कोमुनिदादने या प्रकल्पासाठी आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा लिजवर दिली आहे. दुस:याबाजूने कांपाल येथे गोवा क्रिडा प्राधिकरणाच्या मागे 5 हजार 200 चौरस मीटर क्षेत्रफळाची महामंडळाची जमीन आहे. ती रोपवेसाठी वापरली जाणार आहे. सरकार या प्रकल्पामध्ये काहीच गुंतवणूक करणार नाही. या प्रकल्पामुळे होणा:या एकूण उलाढालीतील पाच टक्के वाटा दरवर्षी संबंधित कंपनी गोवा सरकारला देईल. या प्रकल्पामुळे दोनशे व्यक्तींना रोजगार संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोव्याच्या पर्यटनास हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरेल. शिवाय मांडवी पुल चूकवून कांपाल ते रेईश मागूस असा प्रवासही करणे लोकांना शक्य होईल, असे ते म्हणाले. 
 
मराठी भवनाविषयी चर्चा
मंत्रिमंडळ बैठकीत पर्वरीतील मराठी भवन इमारतीविषयीही चर्चा झाली. त्या ओसाड पडलेल्या इमारतीच्या प्रश्नाचा सरकार अभ्यास करून तोडगा काढील, असे पार्सेकर यांनी सांगितले. गोमंतक मराठी अकादमीतील सातही कर्मचा:यांना नव्या सरकारी मराठी अकादमीत सामावून घेतले जाईल. त्यासाठी मंत्रिमंडळाने शुक्रवारी सात पदे निर्माण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.