शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

मुंब्य्रात मुस्लीम समाजाचा मोर्चा

By admin | Updated: October 8, 2016 04:21 IST

सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे

मुंब्रा : सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी मुंब्रा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चा असल्याने त्याला ‘खामोश मोर्चा’ असे नाव देण्यात आले होते. राज्यातील हा पहिलाच मोर्चा होता. या मोर्चात शाळकरी मुले, तरूण, महिला, पुरुष, आणि मौलवीसह धार्मिक, राजकीय नेते सहभागी झाले होते. दुपारच्या नमाज पठणानंतर दारुल फलाह मशिदीपासून मोर्चाला सुरुवात झाली. अडीचच्या सुमारास मोर्चा रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला. ‘मुस्लिम देश का हिस्सेदार है, किरायेदार नहीं’, ‘मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे,’ या फलकांसह ‘उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम,’ असे फलक शाळकरी मुलांनी हाती धरलेले होते. प्रत्येक चौकात नागरिक मोर्चात सहभागी होत होते. त्यात महिला, मुले, पुरुष मंडळींचा समावेश होता. मुंब्रादेवी देवस्थानच्या कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. बंदोबस्तासाठी पोलिस उपायुक्त आशुतोष त्रिपुत्रे उपस्थित होते. उच्च न्यायालय, सच्चर आयोग, मिश्रा समिती, गोपाल समिती यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. पण त्यानंतरही भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते हुसेन दलवाई यांनी केला. मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीला धार्मिक आरक्षण संबोधले जाते. पण ही धार्मिक आरक्षणाची मागणी नाही. हा समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्याची स्थिती दलित आणि आदिवासींसारखीच आहे. मुस्लिमांमधील ओबीसींसाठी ४.५ टक्के आरक्षण द्यावे, तसेच नोकरी व शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण द्यावे. मुस्लिमांची राज्यातील लोकसंख्या ११.५ टक्के आहे. मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीचे अनुकरण केले आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते व ज्येष्ठ वकिल माजिद मेमन यांनी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा अधिकार कायद्याने योग्य ठरविल्याचे सांगितले. पण भाजप व शिवसेनेचे सरकार मुस्लिमांच्या कायदेशीर अधिकाराची अंमलबजावणी करण्यास नकार देत आहे. वेळकाढूपणा, चालढकल करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण मोर्चाप्रमाणेच मुस्लिम समाजानेही सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. मुस्लिम समाजाच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड सुरुवातीपासून मोर्चात सहभागी होते. मोर्चा संपल्यावर त्यांनी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सादर केले. (प्रतिनिधी)>ठाणे, चिपळूणमध्ये १६ ला मोर्चामुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही कोअर कमिटी स्थापन केली आहे. आरक्षणाचा पुढील मोर्चा ठाणे, चिपळूणमध्ये काढला जाणार आहे. या दोन्ही मोर्चाची तारीख १६ नोव्हेंबर आहे. चिपळूणच्या मोर्चात मी स्वत: सहभागी होणार आहे, असे दलवाई यांनी जाहीर केले. कमिटीच्या निर्णयानुसार कल्याण, भिवंडी, मालेगाव येथे मोर्चाचे आयोजन केले जाईल.