शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुश्रीफ यांनी केले ‘हात वर’ पानसरे मारेकऱ्यांची माहिती नाही

By admin | Updated: July 30, 2015 00:48 IST

‘त्या’ संघटनेबाबत बोलायचे होते...

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची नावे पोलिसांना माहीत आहेत, असा गौप्यस्फोट करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आता त्यासंबंधी अधिक माहिती देण्यास ‘हात वर’ केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’च्या पथकाला त्यांनी याप्रकरणी आपल्याकडे ‘स्पेसिफिक’ काही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे या अतिशय संवेदनशील प्रकरणात त्यांनी अत्यंत स्वैरपणे हा आरोप केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मुश्रीफ यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.कोल्हापूर महापालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या पानसरे स्मारकाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी (दि.२४ जुलै) सकाळी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला होता. मुश्रीफ म्हणाले होते की, ‘मला पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मारेकरी सापडले आहेत परंतु राज्य सरकार मारेकऱ्यांची नावे जाहीर करण्यास प्रतिबंध करत आहे.’ मंगळवारी व बुधवारीही त्यांनी यासंबंधी कोणतीच माहिती विधानसभेत दिलेली नाही. मुश्रीफ सभागृहात उपस्थित होते परंतु बुधवारी दिवसभर याकूबच्या फाशीवरून सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज झाले नाही (प्रतिनिधी)‘त्या’ संघटनेबाबत बोलायचे होते...मुश्रीफ यांच्या या विधानाने राज्यभर खळबळ उडवून दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशीही त्यांनी आपण केलेल्या विधानावर ठाम असून, मंगळवारी (दि. २८ जुलै) विधानसभेत त्याची माहिती देणार असल्याचे जाहीर केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. त्यांनी मुश्रीफ यांच्याकडे या आरोपांबाबतची माहिती घेण्यासाठी पथक पाठविले परंतु त्यांनी आरोपींची अथवा ज्या अधिकाऱ्याने त्यांना ही माहिती दिली, असे ते सांगतात त्यांचीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. डाव्या चळवळीतील कार्यकर्ते ज्या संघटनेवर संशय व्यक्त करतात त्यांच्या बाबतच आपल्याला बोलायचे होते, असे या चौकशीत मुश्रीफ यांनी सांगितले परंतु त्याबद्दल अन्य कोणतीच माहिती ते देऊ शकले नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.