शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अवघी मुंबापुरी झाली पंढरी!

By admin | Updated: July 5, 2017 07:05 IST

आषाढी एकादशीनिमित्ताने विठूच्या गजरात दंग झालेल्या मुंबईकरांमुळे मंगळवारी मुंबापुरीला पंढरीची शोभा आली होती. शाळा, महाविद्यालयांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आषाढी एकादशीनिमित्ताने विठूच्या गजरात दंग झालेल्या मुंबईकरांमुळे मंगळवारी मुंबापुरीला पंढरीची शोभा आली होती. शाळा, महाविद्यालयांपासून कामगारवर्गापर्यंत प्रत्येकाने समाजप्रबोधनासाठी काढलेल्या दिंड्यांमुळे संपूर्ण मुंबईत माउलीचाच जयघोष ऐकू आला.वृक्षलागवड, स्वच्छता, पर्यावरण असे विविध विषय हाती घेऊन वारकरी संप्रदायासोबत माळकरी आणि टाळकरी विद्यार्थीही दिंड्यांमध्ये सामील झाले होते. दरम्यान, नयनरम्य पालखी सोहळ्यांनी मुंबईकरांचे डोळे दिपले. प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिराबाहेर तर हजारो वारकऱ्यांसह शेकडो दिंंड्या येऊन धडकल्या. राम कृष्ण हरीच्या जयघोषात टाळ-मृदंगामुळे वातावरणात हरिनामाचाच गजर ऐकू येत होता. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी स्टॉल लावले होते. दक्षिण मुंबईतील कापड बाजारातील गुमास्ता कामगार युनियननेही मंगलदास मार्केटपासून नजीकच्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढत सर्वांचेच लक्ष वेधले. ग्राहकांना साडी दाखवणाऱ्या गुमास्ता कामगारांच्या हाती टाळ पाहून काही व्यापारीही दिंडीमध्ये सामील झाले होते. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि कोकण भागातील कामगार मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या वारीची परंपरा जपत असल्याचे युनियनचे संपतराव चोरगे यांनी सांगितले.‘एमडी’मध्ये ‘विठूचा गजर’!परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ‘विठूचा गजर’ या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी अनुभवायला मिळाली. मराठी वाङ्मय मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वारकरी संप्रदायाचे महत्त्व व संत परंपरेचे दर्शन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून घडवण्यात आले. उपस्थित गायकांनी संत साहित्याचा संगीतमय प्रवास सादर केला. कोणत्याही धर्माचा, जातीचा, लिंगाचा माणूस वारकरी किंवा माळकरी होऊ शकतो ही संतांची शिकवण विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. वृक्षारोपण दिंडीला नामस्मरण दिंडीची साथमालाड येथील विदर्भ विद्या मंदिर, आई फाउंडेशन आणि शिल्पकार कला मंच यांनी संयुक्त विद्यमाने विदर्भ विद्या मंदिर शाळेपासून संतोषी माता मंदिर व विठ्ठल मंदिराला वळसा घालून शाळेच्या परिसरात दिंडीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, नामस्मरण दिंडी आणि वृक्षारोपण दिंडी काढण्यात आली. वृक्षारोपण दिंडीच्या माध्यमातून लोकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यात आले. सामाजिक जाणिवेत रंगले बालवारकरी! आषाढी एकादशीच्या निमित्ताने कुर्ला येथील डी.एस. शिक्षण संस्थेतर्फे या परिसरात लहान मुलांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पर्यावरणच नव्हे; तर नेत्रदान, रक्तदान आणि सुरक्षा याबद्दलची जनजागृती या वेळी केली गेली. ‘बेटी बचाओ; बेटी पढाओ’ याविषयीचे फलक दिंडीत सामील झालेल्या मुलांनी हाती धरले होते. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या भक्तिप्रद अभंगाची ओळख या वेळी संबंधित शिक्षकांनी मुलांना करून दिली. विठ्ठल आणि रखुमाईची वेशभूषा; तसेच वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा दिंडीतल्या मुलांनी केली होती.बोरीवलीत उभारली पंढरीची वारी!बोरीवलीतील बीमानगर एज्युकेशन सोसायटीने शाळेपासून एक्सर येथील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडीचे आयोजन केले होते. गेल्या ३२ वर्षांपासून दिंडीची परंपरा कायम राखणाऱ्या या शाळेच्या यंदाच्या मिरवणुकीत विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिकृती असलेल्या पारंपरिक चित्ररथाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या वेळी अभंग, भजन, संगीत आणि गायनाने वारकरी मंडळीही विठूमय झाली. मिरवणुकीत सामील झालेल्या ५० मुलांच्या लेझीम पथकाला ढोल पथकाने लयबद्ध साथ दिली. दरम्यान, भगवी पताका हाती घेऊन नाचणारे पारंपरिक वेशातील छोटे वारकरी आणि माउलींच्या पालखीने बोरीवलीत पंढरीचे दृश्य उभे केले होते. शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी या वेळी उपस्थिती लावली.भांडुपमध्ये  पर्यावरण दिंडी भांडुप पश्चिमेकडील नरदास नगरच्या श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी पर्यावरण दिंडी काढत सर्वांचेच लक्ष वेधले. या दिंडीत पूर्व प्राथमिक विभागातील सहावी व सातवी इयत्तेचे आणि निसर्ग मंडळातील सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सामील झाले होते. सुंदर पालखीसह विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. दिंडीत शाळेचे संचालक वसंत सावंत, संचालिका वर्षा सावंत, मुख्याध्यापिका छाया कुरकुटे, उपमुख्याध्यापिका प्रविणा देऊलकर, पर्यवेक्षिका सुनीता गोळे यांनीही सहभाग घेतला.स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा व फलकाद्वारे या वेळी लोकांमध्ये जनजागृतीही केली. दरम्यान, सकाळी विद्यार्थ्यांना पर्यावरण व आषाढी एकादशीचे महत्त्व परिपाठात सांगण्यात आले.अंधेरीत वृक्ष दिंडी अंधेरी पूर्व येथील परांजपे विद्यालय माध्यमिक शाळेने आषाढी एकादिशीनिमित्त वृक्ष दिंडी काढली होती. शाळेतील विद्यार्थी मंडळ, निसर्ग मंडळ, विज्ञान मंडळ, मराठी वाङ्मय मंडळ अशा सर्व मंडळांनी दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपन केले. ही सर्व मंडळे मिळून वर्षभर वृक्षांची निगा राखतात. त्याचबरोबरीने निसर्ग आणि झाडांविषयी जनजागृती करण्यासाठी वृक्ष दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत अंधेरी पोलीस स्टेशनचे घोळवे, उप पोलीस निरीक्षक तसेच सहकारी गावडे, शाळेचे मुख्याध्यापक गणपत हाक्के आणि शिक्षक अमले व शिक्षिका शिर्के उपस्थित होते. ही दिंडी विजयनगर सोसायटी ते सहार रोड अशी फिरवून शाळेत परतली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरण वारीचा समारोपमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी सुरू केलेल्या ‘पर्यावरण वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी अमृता फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव पाचपुते, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक टाळ-मृदंगाच्या गजरात ठेका धरत हरिनामाचा गजर केला.चुनाभट्टीत रिंगण अनुभव! : चुनाभट्टी शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक सावित्रीबाई फुले शाळा तसेच माध्यमिक विद्या विकास हायस्कूलने वारकरी दिंडीचे आयोजन सोमवारी केले होते. विद्यार्थ्यांना वारी आणि वारकरी तसेच दिंडीतून केलेला हरिनामाचा गजर, रिंगण याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन केले होते. संस्थेचे सचिव अनंत पाटील यांची ही संकल्पना होती. मुख्याध्यापक परदेशी आणि दुखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.