शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 22, 2014 06:02 IST

विधानसभा निवडणुकीमुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. त्याचे परिणाम आता पालिका कर्मचा-यांना भोगावे लागणार आहे.

ठाणे : विधानसभा निवडणुकीमुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. त्याचे परिणाम आता पालिका कर्मचा-यांना भोगावे लागणार आहे. दिवाळीच्या १० ते १५ दिवस आधी मिळणारे सानुग्रह अनुदान दिवाळी सुरू झाल्यानंतरही पालिका कर्मचाऱ्यांच्या हातीच पडलेले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे़ कारण दिवाळीनंतरच त्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी पालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु, पालिकेच्या तिजोरीत पैसा नसतानाही तत्कालीन महापौरांनी अशा प्रकारे घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. केवळ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून घाई घाईनेच ही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. पालिकेचा सुमारे ८० टक्के कर्मचारी हे निवडणूक कामाला लागले. त्याचा परिणाम पालिकेच्या एकूण उत्पन्नावर सुध्दा झाला असून, एलबीटीची वसुली सुध्दा रोडावली आहे. तसेच मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीवर देखील परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यांतच पालिकेच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल, एवढी रक्कम होती. सध्या पालिकेने पुन्हा ठेकेदारांची बिले सुद्धा देण्यास विलंब केला आहे. दरम्यान, पालिकेत आजच्या घडीला सुमारे ७,५०० कर्मचारी असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या ही २,२०० च्या आसपास आहे. तसेच परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही २,५०० च्या आसपास आहे. तर शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या ही १,२०० च्या जवळपास आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या १५ ते २० दिवस आधी सानुग्रह अनुदान हाती पडते. पालिका कर्मचाऱ्यांना १२ हजाार ५०० आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुमारे ६,५०० सानुग्रह अनुदान घोषीत केले आहे. या पोटी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे १५ कोटींचा बोजा पडणार आहे. असे असले तरी दिवाळीपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांची हाती सानुग्रह अनुदान दिले जाईल, असा दावा पालिकेने केला होता. परंतु आता दिवाळी सुरू झाली तरी सुध्दा अद्यापही त्यांच्या हाती सानुग्रह अनुदान न पडल्याने ते हवालदिल झाले आहेत. यामुळे त्यांचे दिवाळीपूर्वीचे नियोजन पुरते कोलडले आहे. दिवाळीच्या खरेदीबरोबर बच्चेकंपनीला सुटीच्या दिवसांत बाहेर फिरायला कसे घेऊन जायचे याचेही नियोजन कोलमडले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सानुग्रह अनुदानविषयी विचारणा केली असता आज देऊ, उद्या देऊ असे उत्तर कर्मचाऱ्यांना मिळत आहे. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की दिवाळीनंतरच किंबहुना येत्या दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या हाती सानुग्रह पडले, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)