शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

मिळकतींसाठी महापालिकेची अभय योजना

By admin | Updated: August 2, 2016 01:14 IST

घरमालकांनी स्वत:हून पालिकेकडे नोंद करून घेतल्यास त्यांना करपात्र रकमेवर दहा टक्के दंडाची रक्कम माफ करण्याची अभय योजना महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली

पुणे : करआकारणी न झालेल्या आणि वापरात बदल केलेल्या मिळकतींची घरमालकांनी स्वत:हून पालिकेकडे नोंद करून घेतल्यास त्यांना करपात्र रकमेवर दहा टक्के दंडाची रक्कम माफ करण्याची अभय योजना महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. ही योजना १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी लागू राहील. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ महापालिकेच्या टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ वर फोन केल्यास मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही पार पाडली जाणार आहे. शहरातील अनेक घरांची मिळकत कर विभागाकडे नोंदणी झालेली नाही तसेच काही मिळकतींची निवासी अशी नोंद असताना प्रत्यक्षात त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर सुरू आहे. याचा जीआएस पद्धतीने सर्व्हे करण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सर्व्हेमध्ये अशा मिळकती उजेडात आल्यास त्यांना मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकेल. या पार्श्वभूमीवर, ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना अभय योजनेच्या माध्यमातून एक संधी देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, मिळकत कर विभागप्रमुख सुहास मापारी उपस्थित होते. मिळकत कर विभागाच्या वतीने पालिकेच्या संकेतस्थळावरच एक स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले असून, त्यावरही अभय योजनेत सहभागी होण्यासाठी माहिती देता येईल. कुणाल कुमार म्हणाले, ‘‘करआकारणी करून न घेतलेल्या मिळकती आढळून आल्यास त्यांच्या करपात्र रकमेवर दरवर्षी दहा टक्के दंड (प्रशासकीय शुल्क किंवा विलंब शुल्क) आकारला जातो. अभय योजनेच्या माध्यमातून दंडाच्या रकमेतून सूट दिली जाणार आहे. त्यांच्याकडून केवळ करपात्र रक्कम घेतली जाईल. जीआयएस मॅपिंगमध्ये सर्व मिळतींचा डाटा पालिकेकडे उपलब्ध होणार आहे. त्या वेळी दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.’’शहरात सध्या ८ लाख २५ हजार मिळकती असल्याची महापालिकेकडे नोंद झाली आहे. यापेक्षा जास्त मिळकती शहरात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक घराला मिळणार क्रमांकशहरात जीआय मॅपिंगद्वारे प्रत्येक घराचा सर्व्हे करून त्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. घराचा पत्ता सांगण्यासाठी सध्या जवळपासची खूण, गल्ली, रस्ता यांचे नाव सांगावे लागते. प्रत्येक घराला क्रमांक दिला गेल्यानंतर केवळ त्या क्रमांकाच्या आधारे नागरिकांपर्यंत सर्व सुविधा पोहोचू शकणार आहेत. जीआयएस सर्व्हेमुळे मिळकत कर विभागाकडे नोंद नसलेल्या व वापरात बदल झालेल्या सर्व मिळकतींच्या माहितीचा डाटा महापालिकेकडे जमा होणार आहे.महापालिकेला मिळकत आकारणीतून ८०० ते ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मागील आर्थिक वर्षात मिळकत कर विभागाने थकलेल्या मिळकत कराबाबत अभय योजना जाहीर करून ११०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. चालू आर्थिक वर्षात मिळकत कराचे १,६०० कोटी रूपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली.