शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची पाण्याची चिंता मिटली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 05:50 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. तुळशी तलाव आधीच भरला होता. धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे विहार, मोडक सागर आणि तानसा हे तिन्ही तलाव गेल्या २४ तासांत एकानंतर एक भरून वाहू लागले आहेत. मुंबईच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात तलावांत एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते. आतापर्यंत सातही तलावात ११ लाख ८९ हजार ९४५ लक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे.गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पालिकेने मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली होती. मात्र तुळशी तलाव भरल्यावर ही पाणीकपात त्वरित मागे घेण्यात आली. विहार तलावातून दररोज ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर तलावातून दररोज ५५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर तानसा तलावातून दररोज अंदाजे ६०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तुळशी तलाव १९ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. विहार तलाव हा १ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मोडकसागर तलाव हा १ आॅगस्ट रोजीच्या रात्री १० वाजून २८ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. २ आॅगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे.