शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

मुंबईची पाण्याची चिंता मिटली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 05:50 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. तुळशी तलाव आधीच भरला होता. धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे विहार, मोडक सागर आणि तानसा हे तिन्ही तलाव गेल्या २४ तासांत एकानंतर एक भरून वाहू लागले आहेत. मुंबईच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात तलावांत एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते. आतापर्यंत सातही तलावात ११ लाख ८९ हजार ९४५ लक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे.गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पालिकेने मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली होती. मात्र तुळशी तलाव भरल्यावर ही पाणीकपात त्वरित मागे घेण्यात आली. विहार तलावातून दररोज ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर तलावातून दररोज ५५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर तानसा तलावातून दररोज अंदाजे ६०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तुळशी तलाव १९ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. विहार तलाव हा १ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मोडकसागर तलाव हा १ आॅगस्ट रोजीच्या रात्री १० वाजून २८ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. २ आॅगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे.