शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

मुंबईची पाण्याची चिंता मिटली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 05:50 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. तुळशी तलाव आधीच भरला होता. धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे विहार, मोडक सागर आणि तानसा हे तिन्ही तलाव गेल्या २४ तासांत एकानंतर एक भरून वाहू लागले आहेत. मुंबईच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात तलावांत एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते. आतापर्यंत सातही तलावात ११ लाख ८९ हजार ९४५ लक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे.गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पालिकेने मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली होती. मात्र तुळशी तलाव भरल्यावर ही पाणीकपात त्वरित मागे घेण्यात आली. विहार तलावातून दररोज ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर तलावातून दररोज ५५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर तानसा तलावातून दररोज अंदाजे ६०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तुळशी तलाव १९ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. विहार तलाव हा १ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मोडकसागर तलाव हा १ आॅगस्ट रोजीच्या रात्री १० वाजून २८ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. २ आॅगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे.