शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मुंबईची पाण्याची चिंता मिटली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 05:50 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. तुळशी तलाव आधीच भरला होता. धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे विहार, मोडक सागर आणि तानसा हे तिन्ही तलाव गेल्या २४ तासांत एकानंतर एक भरून वाहू लागले आहेत. मुंबईच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात तलावांत एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते. आतापर्यंत सातही तलावात ११ लाख ८९ हजार ९४५ लक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे.गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पालिकेने मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली होती. मात्र तुळशी तलाव भरल्यावर ही पाणीकपात त्वरित मागे घेण्यात आली. विहार तलावातून दररोज ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर तलावातून दररोज ५५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर तानसा तलावातून दररोज अंदाजे ६०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तुळशी तलाव १९ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. विहार तलाव हा १ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मोडकसागर तलाव हा १ आॅगस्ट रोजीच्या रात्री १० वाजून २८ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. २ आॅगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे.