शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे साहेब टून्न !

By admin | Updated: December 10, 2014 00:48 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली

रात्रभर गोंधळ - कर्मचाऱ्यांना मारहाण नरेश डोंगरे - नागपूरविधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली आणि नोकरीहून काढून टाकण्याचीही धमकी दिली. शिपायापासून शीर्षस्थापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याने या प्रकाराचा निषेध नोंदविला असून, संबंधित उच्चाधिकाऱ्याच्या हा प्रताप चर्चा आज दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकार सध्या नागपुरात आले आहे. अर्थात सर्वच खात्याचे उच्च अधिकारीही नागपुरात मुक्कामी आहेत. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘या’ उच्चाधिकाऱ्याची निवास व्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेच्या दीक्षाभूमीजवळच्या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे. उच्चपदस्थ असल्यामुळे अर्थातच त्यांच्या दिमतीला शासकीय नोकरदारांचीही व्यवस्था आहे. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास हे अधिकारी महाशय निवासस्थळी पोहचले. प्रारंभी बाथरूम स्वच्छ नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. काही वेळेनंतर गरम पाण्याची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. साहेब ‘तर्र’ असल्यामुळे त्यांना कुणी समजावण्याच्या भानगडीत पडले नाही. एका कर्मचाऱ्यानेनिवासाच्या ठिकाणच्या सोयी सुविधा आपल्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगितले असता या अधिकाऱ्याने त्याला चक्क मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिथरलेल्या या उच्चाधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले. पहाटे ३ पर्यंत त्याचा गोंधळ सुरू होता. नाश्त्यासाठी उद्धार सकाळी चांगल्या दर्जाचा नाश्ता तातडीने मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचाही या ‘साहेबांनी’ उद्धार केला. साहेबांकडून होत असलेला अपमान असह्य झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे फोनवरून तक्रारवजा माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याच्या उच्चाधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. दुपार झाली तरी साहेब शांत व्हायचे नाव घेत नसल्यामुळे कर्मचारी-अधिकारी संतप्त झाले. त्यांच्या निषेधाचे सूर कर्णोपकर्णी मंत्रालयात पोहचले. सायंकाळी कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या संतापजनक प्रकरणाची माहिती पोहचल्याचे सांगितले जाते. वरिष्ठांची धावपळ प्रकरण मंत्रालयात पोहचल्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच ‘घटनास्थळ’ गाठून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘साहेब’ मोठे असल्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना ‘त्यांनी’ घातलेल्या गोंधळाची माहिती मंत्रालयात पोहचल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला. तक्रार करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी या उच्चाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे कर्मचारी-अधिकारी अधिकच संतप्त झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये, हा गोंधळ बाहेर चर्चेला येऊ नये म्हणून सर्वच संबंधितांना गप्प राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.