शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

मुंबईचे साहेब टून्न !

By admin | Updated: December 10, 2014 00:48 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली

रात्रभर गोंधळ - कर्मचाऱ्यांना मारहाण नरेश डोंगरे - नागपूरविधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली आणि नोकरीहून काढून टाकण्याचीही धमकी दिली. शिपायापासून शीर्षस्थापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याने या प्रकाराचा निषेध नोंदविला असून, संबंधित उच्चाधिकाऱ्याच्या हा प्रताप चर्चा आज दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकार सध्या नागपुरात आले आहे. अर्थात सर्वच खात्याचे उच्च अधिकारीही नागपुरात मुक्कामी आहेत. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘या’ उच्चाधिकाऱ्याची निवास व्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेच्या दीक्षाभूमीजवळच्या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे. उच्चपदस्थ असल्यामुळे अर्थातच त्यांच्या दिमतीला शासकीय नोकरदारांचीही व्यवस्था आहे. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास हे अधिकारी महाशय निवासस्थळी पोहचले. प्रारंभी बाथरूम स्वच्छ नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. काही वेळेनंतर गरम पाण्याची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. साहेब ‘तर्र’ असल्यामुळे त्यांना कुणी समजावण्याच्या भानगडीत पडले नाही. एका कर्मचाऱ्यानेनिवासाच्या ठिकाणच्या सोयी सुविधा आपल्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगितले असता या अधिकाऱ्याने त्याला चक्क मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिथरलेल्या या उच्चाधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले. पहाटे ३ पर्यंत त्याचा गोंधळ सुरू होता. नाश्त्यासाठी उद्धार सकाळी चांगल्या दर्जाचा नाश्ता तातडीने मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचाही या ‘साहेबांनी’ उद्धार केला. साहेबांकडून होत असलेला अपमान असह्य झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे फोनवरून तक्रारवजा माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याच्या उच्चाधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. दुपार झाली तरी साहेब शांत व्हायचे नाव घेत नसल्यामुळे कर्मचारी-अधिकारी संतप्त झाले. त्यांच्या निषेधाचे सूर कर्णोपकर्णी मंत्रालयात पोहचले. सायंकाळी कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या संतापजनक प्रकरणाची माहिती पोहचल्याचे सांगितले जाते. वरिष्ठांची धावपळ प्रकरण मंत्रालयात पोहचल्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच ‘घटनास्थळ’ गाठून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘साहेब’ मोठे असल्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना ‘त्यांनी’ घातलेल्या गोंधळाची माहिती मंत्रालयात पोहचल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला. तक्रार करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी या उच्चाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे कर्मचारी-अधिकारी अधिकच संतप्त झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये, हा गोंधळ बाहेर चर्चेला येऊ नये म्हणून सर्वच संबंधितांना गप्प राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.