शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे साहेब टून्न !

By admin | Updated: December 10, 2014 00:48 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली

रात्रभर गोंधळ - कर्मचाऱ्यांना मारहाण नरेश डोंगरे - नागपूरविधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली आणि नोकरीहून काढून टाकण्याचीही धमकी दिली. शिपायापासून शीर्षस्थापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याने या प्रकाराचा निषेध नोंदविला असून, संबंधित उच्चाधिकाऱ्याच्या हा प्रताप चर्चा आज दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकार सध्या नागपुरात आले आहे. अर्थात सर्वच खात्याचे उच्च अधिकारीही नागपुरात मुक्कामी आहेत. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘या’ उच्चाधिकाऱ्याची निवास व्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेच्या दीक्षाभूमीजवळच्या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे. उच्चपदस्थ असल्यामुळे अर्थातच त्यांच्या दिमतीला शासकीय नोकरदारांचीही व्यवस्था आहे. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास हे अधिकारी महाशय निवासस्थळी पोहचले. प्रारंभी बाथरूम स्वच्छ नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. काही वेळेनंतर गरम पाण्याची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. साहेब ‘तर्र’ असल्यामुळे त्यांना कुणी समजावण्याच्या भानगडीत पडले नाही. एका कर्मचाऱ्यानेनिवासाच्या ठिकाणच्या सोयी सुविधा आपल्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगितले असता या अधिकाऱ्याने त्याला चक्क मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिथरलेल्या या उच्चाधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले. पहाटे ३ पर्यंत त्याचा गोंधळ सुरू होता. नाश्त्यासाठी उद्धार सकाळी चांगल्या दर्जाचा नाश्ता तातडीने मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचाही या ‘साहेबांनी’ उद्धार केला. साहेबांकडून होत असलेला अपमान असह्य झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे फोनवरून तक्रारवजा माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याच्या उच्चाधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. दुपार झाली तरी साहेब शांत व्हायचे नाव घेत नसल्यामुळे कर्मचारी-अधिकारी संतप्त झाले. त्यांच्या निषेधाचे सूर कर्णोपकर्णी मंत्रालयात पोहचले. सायंकाळी कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या संतापजनक प्रकरणाची माहिती पोहचल्याचे सांगितले जाते. वरिष्ठांची धावपळ प्रकरण मंत्रालयात पोहचल्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच ‘घटनास्थळ’ गाठून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘साहेब’ मोठे असल्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना ‘त्यांनी’ घातलेल्या गोंधळाची माहिती मंत्रालयात पोहचल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला. तक्रार करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी या उच्चाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे कर्मचारी-अधिकारी अधिकच संतप्त झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये, हा गोंधळ बाहेर चर्चेला येऊ नये म्हणून सर्वच संबंधितांना गप्प राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.