शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे नाले गाळात

By admin | Updated: April 28, 2017 02:48 IST

ठेकेदारांच्या प्रतीक्षेत नाल्यांची सफाई १५ दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे अद्याप १९ टक्केच नाले साफ झाले आहेत. तर मिठी नदीचे

मुंबई : ठेकेदारांच्या प्रतीक्षेत नाल्यांची सफाई १५ दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे अद्याप १९ टक्केच नाले साफ झाले आहेत. तर मिठी नदीचे १४ टक्के काम झाले आहे. परंतु मिठी नदीचा प्रवाह असलेल्या पश्चिम उपनगरात अद्याप सफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के तर पावसाळ्यानंतर २० टक्के नाल्यांची सफाई करण्यात येते. मात्र नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई झाल्यामुळे नवीन ठेकेदार पुढे येण्यास तयार नव्हते. तसेच गाळ टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने ठेकेदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पावसाळ्यापूर्व कामांसाठी पालिका प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना विभागस्तरावरील कामगार व बिगर शासकीय संस्थांमार्फत छोट्या नाल्यांची सफाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभाग पातळीवर मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे १ एप्रिलपासून तर छोट्या नाल्यांची कामे ७ एप्रिलपासून सुरू झाली. मोठ्या नाल्यांच्या सफाईचे कंत्राट गेल्याच आठवड्यात देण्यात आले. त्यानुसार काही ठिकाणी धिम्या गतीने गाळ काढण्यास सुरुवात होत आहे. मात्र आठवड्यानंतरही यात काही फारसा बदल झालेला नाही. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात १३ टक्के, पश्चिम उपनगरात २१, पूर्व उपनगरत १७ असे एकूण १९ टक्के नाल्यांचे काम झाले आहे. एप्रिल महिना संपण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. मात्र अशा संथ कामामुळे नाल्यांमध्ये गाळ पडून असल्याने ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. (प्रतिनिधी)असा होता नालेसफाईचा घोटाळा -नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे २०१५मध्ये उजेडात आले. या प्रकरणी स्थापन चौकशी समितीने नालेसफाईच्या कामात अनियमितता, गाळ वाहून नेण्यात घोटाळा आणि गाळ टाकण्यासाठी दिलेल्या कचराभूमीचे ना हरकत प्रमाणपत्रही बोगस असल्याचे आढळून आले. या प्रकरणी १४ अधिकाऱ्यांचे निलंबन आणि सात ठेकेदारांवर फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. मिठी नदी गाळातच : मिठी नदीने २००५मध्ये मुंबईला मगरमिठीत घेतले होते. त्यामुळे मिठी नदीने पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडली की मुंबईचा जीव मुठीत येतो. हा धोका टाळण्यासाठी मिठी नदीच्या सफाईकडे विशेष लक्ष दरवर्षी देण्यात येते. मात्र या वेळेस मिठी नदीची सफाई संथगतीने सुरू आहे. पश्चिम उपनगरातील मिठी नदीच्या प्रवाहाची सफाईही सुरू झालेली नाही. यामुळे पावसाळ्यात मिठी नदी डोकेदुखीचे कारण ठरणार आहे.