शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

मुंबईच्या विकासाची चर्चा दोन दिवसांत आटोपणार

By admin | Updated: July 14, 2017 02:25 IST

तीन वर्षांचा लेटमार्क लागूनही २०१४ ते २०३४ या २० वर्षांतील मुंबईच्या विकासाचा आराखडा चर्चेच्या गदारोळात अडकला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन वर्षांचा लेटमार्क लागूनही २०१४ ते २०३४ या २० वर्षांतील मुंबईच्या विकासाचा आराखडा चर्चेच्या गदारोळात अडकला आहे. या आराखड्याचा पहिला मसुदा वादग्रस्त ठरल्यानंतर सुधारित आराखडा तयार झाला. मात्र, आरे कॉलनीचे द्वार विकासासाठी खुले करणे, काही जागांवरील आरक्षण, असे वाद कायम आहेत. त्यामुळे या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांनी तीन वेळा मुदतवाढ मागून घेतली. मात्र, ही मुदतही संपत असल्याने अवघ्या दोन दिवसांत (१४, १५ जुलै) पालिका महासभेत चर्चा आटोपण्यात येणार आहे. मुंबईचा सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांच्या कालावधीसाठीचा विकास आराखडा पालिकेने तयार केला. या आराखड्यावर ५० हजारांहून अधिक सूचना व हरकती आल्या होत्या. यामुळे भाजपा नेत्यांच्या मागणीनुसार आराखड्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी रद्द करीत नव्याने आराखडा बनवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने सुधारित आराखडा सादर केला. मात्र, पाच हजारांहून अधिक हरकती आल्यानंतर आराखड्याचा सुधारित मसुदाही वादात सापडला. त्यामुळे हा आराखडा समजून घेण्यासाठी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनी तीन वेळा आराखड्याला मुदतवाढ मागून घेतली. मात्र, १८ जुलैपूर्वी हा आराखडा मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविणे आवश्यक आहे. त्यामुळे अवघे चार दिवस पालिकेकडे चर्चेसाठी शिल्लक आहेत. त्यामुळे १४ व १५ जुलै रोजी बोलाविलेल्या महासभेत आपल्या सूचना मांडून या आराखड्याला मंजुरी देण्यात येणार आहे.राज्य सरकारकडून आराखड्यात आवश्यक ते फेरबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आराखड्याला अंतिम मंजुरी देतील. या मंजुरीनंतर आराखड्याला अंमलबजावणीची जबाबदारी पालिका आयुक्त यांच्यावर असणार आहे. १९९१च्या विकास आराखड्यातील आरक्षणे आहे तशीच २०३४ च्या विकास आराखड्यात दर्शविली आहेत. त्या आरक्षित जागा पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. ही आरक्षणे विकसित करण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात २०९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास आराखडा येत्या १८ जुलैपर्यंत पालिका सभागृहात मंजूर करून नगरविकास खात्याकडे पाठविणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमी वेळेत घाईघाईने आराखडा मंजूर होण्याची शक्यता आहे.