शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

मुंबईकरांचा रेल्वे प्रवास महागणार? रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला भाडेवाढीचा प्रस्ताव

By admin | Updated: November 2, 2016 12:20 IST

गेल्या वर्षभरातील तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याने मुंबईकरांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - गेल्या वर्षभरातील तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याने मुंबईकरांचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेने भाडेवाढीसंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास तिकीट आणि मासिक पासच्या दरांमध्ये मोठी वाढ होणार असून त्याची  झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. 
गेल्या वर्षात पश्चिम रेल्वेला झालेला १४०० कोटींचा तोटा झाला होता, तो भरून काढण्यासाठीच हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीच्या दरांमध्ये फारसा फरक पडणार नसला तरी उपनगरीय रेल्वे प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या  फर्स्ट क्लासच्या पासमध्ये ४७ टक्के तर सेकंड क्लासच्या पासच्या दरांमध्ये ३८ टक्के इतकी घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या किमान तिकीटासाठी असलेलं 9 किमीची मर्यादाही 5 किमीवर आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिचाला चाट बसणार आहे.
गेली अनेक वर्षे १४ ते १६ पैसे प्रतिकिमी या अल्प दरात मुंबई उपनगरीय रेल्वेची वाहतूक होत होती. त्यामुळेच हा तोटा झाला असून तो भरून काढण्याची गरज असल्यामुळे केंद्राकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार असल्याचे समजते.