शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

मुंबई मेट्रो - भ्रष्ट ठेकेदारांना मुख्यमंत्र्यांचे अभय

By admin | Updated: October 21, 2016 20:35 IST

मुंबईच्या रस्ते घोटाळ्यातील आरोपी कंपनी जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लि. कंपनीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएने मुंबई मेट्रो 3 आणि 7 चे पाच हजार कोटींचे काम दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ - मुंबईच्या रस्ते घोटाळ्यातील आरोपी कंपनी जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लि. कंपनीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएने मुंबई मेट्रो 3 आणि 7 चे पाच हजार कोटींचे काम दिले आहे. हे काम देताना टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लि. कंपनीला सरकार कसे पाठीशी घालते, हे पुराव्यानिशी दाखवून दिले. रस्ते घोटाळ्यात कारवाई झालेल्या जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लि. कंपनीला मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएने पाच हजार कोटीचे कंत्राट दिले आहे. मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लि. कंपनीविरोधात गुन्हा दाखल असून, कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मुंबई हायकोर्टाने जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लि. कंपनीला महापालिकेने दिलेली कामे रद्द केली आहेत. याबाबत राज्याचे महाधिवक्ता यांचे मत ही एमएमआरडीएने मागवले होते. त्यांनीही जे कुमार कंपनीला टेंडर नाही दिले तरी कायदेशीर अडचण येणार नाही असे तर सांगितलेच आहे. पण यासोबतच कंपनीवर महापालिकेने केलेली कारवाई आणि हायकोर्टाने ओढलेले ताशेरे विचारात घेणे आवश्यक आहे, असे म्हटलेले असतानाही जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लि. ला दिलेले काम रद्द न करणे म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणे असून, हे केवळ या मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्यामुळेच अंतर्गत हितसंबंध जोपासण्यासाठी झाले आहे. यामुळे भ्रष्टाचाराविरोधात असण्याचा आव आणणा-या भाजपचे ढोंग उघडे पडले आहे.

याचबरोबर आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीवरही मुंबई महानगरपालिकेने तशीच कारवाई केली असताना भाजप शासीत आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातील नागपूर महानगर पालिकेने 35 कोटींचे कंत्राट देऊन भाजपने नैतिकतेचे सर्व बंध ओलांडले आहेत.

याचबरोबर मुंबई महापालिकेतर्फे काळ्या यादीत टाकण्याच्या प्रक्रियेत चालढकल केली जात आहे. महाधिवक्त्यांनी आपले मत मांडताना एमएमआरडीएने जनतेचे हित लक्षात घ्यावे असे म्हटले आहे. अशा महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम जे कुमार सारख्या भ्रष्टाचारात लिप्त कंपनीला देणे म्हणजे लाखो मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळ आहे आहे. यातून जनतेचे कोणते हित मुख्यमंत्री पाहात आहेत हे स्पष्ट करावे. या संपूर्ण प्रक्रियेत भाजपच्या केंद्रीय पातळीवर की राज्य पातळीवर कुठे भ्रष्टाचार झाला हे त्याने स्पष्ट होईल असे सावंत म्हणाले.