शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मुंबई-गोवा महामार्ग गजबजला

By admin | Updated: September 5, 2016 02:04 IST

मोठ्या प्रमाणात पडणारे खड्डे याला कंटाळून गेली अनेक वर्षे गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून न जाता अन्य मार्गाने जात होते

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम, त्याचप्रमाणे दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात पडणारे खड्डे याला कंटाळून गेली अनेक वर्षे गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून न जाता अन्य मार्गाने जात होते. तसेच यंदा महाड सावित्री पूल दुर्घटना ही नजरेसमोर होती. परंतु महामार्गावरील खड्डे बुजविल्याने महामार्ग चांगल्या स्थितीत असून, गेल्या दोन दिवसांपासून या मार्गाने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा महामार्ग गजबजला आहे.संपूर्ण कोकणात सोमवारी गणरायाचे आगमन होणार आहे. अनेक वर्षांपासून मुंबई, सुरत, गुजरात अन्य ठिकाणांहून कोकणात जाणारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कमी झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पनवेल ते इंदापूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम व दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर पडणारे मोठमोठे खड्डे, यामुळे होणारी वाहतूककोंडी या सर्व बाबींना कोकणातील चाकरमानी कंटाळून पुणे द्रुतगती महामार्गावरून ६० ते ७० किमी जास्त अंतर घेत दरवर्षी कोकणात जात होते. तर या मार्गावरील खासकरून पनवेल विभाग पोलिसांमार्फत याच मार्गी वाहनांना वळवण्यात येत असे. रस्ता जरी चांगला असला तरी लांब पल्लामुळे चाकरमान्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असे. यंदा शासनाने या मार्गावर गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याच्या कामावर जातीने लक्ष दिल्याने पनवेल ते कोकणात जाणारे सर्वच मार्ग चकाचक झाले. दरवर्षी मुरमाने खड्डे भरले जात असत. यंदा डांबर टाकून भरण्यात आले आहेत. यामुळे चाकरमान्यांनी या मार्गाला यंदा पसंती दिली. (वार्ताहर)>खड्डे भरल्यामुळे कोंडीचा प्रश्न सुटलामुंबईवरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यासाठी तीन मार्ग अवलंबले. मुंबई-पामबीच-खारपाडा; दुसरा मुंबई-पनवेल-वडखळ सरळ कोकण तर मुंबई-कळंबोली-पुणे द्रुतगती मार्गे पाली-वाकण-नागोठणे-कोकण असे तीन मार्ग अवलंबल्याने वाहतूक तीन मार्गी विभागली. यामुळे दरवर्षी वडखळ नाका येथे होणाऱ्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला; तर खड्ड्यांमुळे होणारी वाहतूककोंडीही यामुळे बंद झाली. फक्त कोलाड व माणगाव या दोन ठिकाणी काही प्रमाणात वाहतूककोंडी पाहावयास मिळाली. >सावित्री दुर्घटनेचा काही परिणाम नाही२ आॅगस्ट रोजी महाडमध्ये सावित्री पूल कोसळून ४१ प्रवाशांचे प्राण गेले होते. यंदा या दुर्घटनेचा परिणाम गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या वाहतुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र यंदा याच्या उलट परिस्थिती पाहावयास मिळाली. एवढी मोठी घटना घडली असतानादेखील याच मार्गाला व बाजूच्या पुलावरून कोणत्याही तऱ्हेची भीती न बाळगता कोकणातील चाकरमान्यांनी पसंती दिली.