शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मुंबई-गोवा महामार्ग गजबजला

By admin | Updated: September 5, 2016 02:04 IST

मोठ्या प्रमाणात पडणारे खड्डे याला कंटाळून गेली अनेक वर्षे गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून न जाता अन्य मार्गाने जात होते

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम, त्याचप्रमाणे दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात पडणारे खड्डे याला कंटाळून गेली अनेक वर्षे गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून न जाता अन्य मार्गाने जात होते. तसेच यंदा महाड सावित्री पूल दुर्घटना ही नजरेसमोर होती. परंतु महामार्गावरील खड्डे बुजविल्याने महामार्ग चांगल्या स्थितीत असून, गेल्या दोन दिवसांपासून या मार्गाने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा महामार्ग गजबजला आहे.संपूर्ण कोकणात सोमवारी गणरायाचे आगमन होणार आहे. अनेक वर्षांपासून मुंबई, सुरत, गुजरात अन्य ठिकाणांहून कोकणात जाणारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कमी झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पनवेल ते इंदापूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम व दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर पडणारे मोठमोठे खड्डे, यामुळे होणारी वाहतूककोंडी या सर्व बाबींना कोकणातील चाकरमानी कंटाळून पुणे द्रुतगती महामार्गावरून ६० ते ७० किमी जास्त अंतर घेत दरवर्षी कोकणात जात होते. तर या मार्गावरील खासकरून पनवेल विभाग पोलिसांमार्फत याच मार्गी वाहनांना वळवण्यात येत असे. रस्ता जरी चांगला असला तरी लांब पल्लामुळे चाकरमान्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असे. यंदा शासनाने या मार्गावर गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याच्या कामावर जातीने लक्ष दिल्याने पनवेल ते कोकणात जाणारे सर्वच मार्ग चकाचक झाले. दरवर्षी मुरमाने खड्डे भरले जात असत. यंदा डांबर टाकून भरण्यात आले आहेत. यामुळे चाकरमान्यांनी या मार्गाला यंदा पसंती दिली. (वार्ताहर)>खड्डे भरल्यामुळे कोंडीचा प्रश्न सुटलामुंबईवरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यासाठी तीन मार्ग अवलंबले. मुंबई-पामबीच-खारपाडा; दुसरा मुंबई-पनवेल-वडखळ सरळ कोकण तर मुंबई-कळंबोली-पुणे द्रुतगती मार्गे पाली-वाकण-नागोठणे-कोकण असे तीन मार्ग अवलंबल्याने वाहतूक तीन मार्गी विभागली. यामुळे दरवर्षी वडखळ नाका येथे होणाऱ्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला; तर खड्ड्यांमुळे होणारी वाहतूककोंडीही यामुळे बंद झाली. फक्त कोलाड व माणगाव या दोन ठिकाणी काही प्रमाणात वाहतूककोंडी पाहावयास मिळाली. >सावित्री दुर्घटनेचा काही परिणाम नाही२ आॅगस्ट रोजी महाडमध्ये सावित्री पूल कोसळून ४१ प्रवाशांचे प्राण गेले होते. यंदा या दुर्घटनेचा परिणाम गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या वाहतुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र यंदा याच्या उलट परिस्थिती पाहावयास मिळाली. एवढी मोठी घटना घडली असतानादेखील याच मार्गाला व बाजूच्या पुलावरून कोणत्याही तऱ्हेची भीती न बाळगता कोकणातील चाकरमान्यांनी पसंती दिली.