शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

मुंबई-गोवा बोटवाहतूक लवकरच सुरू होणार!

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या दिवाळीनंतर मुंबई-गोवा सागरी बोटवाहतूक सुुरू होणार आहे. कोकण बंदर विकास समितीचे अध्यक्ष आनंद हुले यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. रस्ते वाहतुकीला महत्व येण्याआधी ४० वर्षांपूर्वीच्या काळात कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोवा अशी जलमार्ग बोटवाहतूक सुरू होती. त्यावेळी बोटीद्वारे प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात होती. परिणामी कोकणच्या सागरी किनाऱ्यावरील सर्वंच बंदरे रात्रंदिवस गजबजलेली असायची. या बंदरांच्या भागात असलेल्या गावांचा, शहरांचा मोठा विकास झाला होता. त्यांची अर्थव्यवस्थाही याच बोटवाहतुकीवर चालायची. मात्र, रस्ते वाहतुकीची साधने वाढली. काळाच्या ओघात सागरी बोटवाहतूक बंद झाली. त्यानंतरच्या काळात बोटवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र, मुंबई - गोवा बोट वाहतूक सुरू व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोकण बंदर विकास समिती कार्यरत होती. पाठपुरावा सुरू होता. अखेर मुंबई-गोवा जलमार्गावर दिवाळीनंतर बोट वाहतूक सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विकास मंडळामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. सिंगापूरला स्टार क्रुझ बोट सेवा यशस्वीरित्या सुरू आहे. त्याच धर्तीवर दिवाळीनंतर कोकण क्रुझ बोट मुंबई-गोवा जलमार्गावर सुरू होत असून, त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरे पुन्हा गजबजणार आहेत. किनारपट्टीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. दिवाळीला अवघे काही दिवस सुरू राहिले असून, ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)