शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मुंबई-गोवा बोटवाहतूक लवकरच सुरू होणार!

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या दिवाळीनंतर मुंबई-गोवा सागरी बोटवाहतूक सुुरू होणार आहे. कोकण बंदर विकास समितीचे अध्यक्ष आनंद हुले यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. रस्ते वाहतुकीला महत्व येण्याआधी ४० वर्षांपूर्वीच्या काळात कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोवा अशी जलमार्ग बोटवाहतूक सुरू होती. त्यावेळी बोटीद्वारे प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात होती. परिणामी कोकणच्या सागरी किनाऱ्यावरील सर्वंच बंदरे रात्रंदिवस गजबजलेली असायची. या बंदरांच्या भागात असलेल्या गावांचा, शहरांचा मोठा विकास झाला होता. त्यांची अर्थव्यवस्थाही याच बोटवाहतुकीवर चालायची. मात्र, रस्ते वाहतुकीची साधने वाढली. काळाच्या ओघात सागरी बोटवाहतूक बंद झाली. त्यानंतरच्या काळात बोटवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र, मुंबई - गोवा बोट वाहतूक सुरू व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोकण बंदर विकास समिती कार्यरत होती. पाठपुरावा सुरू होता. अखेर मुंबई-गोवा जलमार्गावर दिवाळीनंतर बोट वाहतूक सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विकास मंडळामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. सिंगापूरला स्टार क्रुझ बोट सेवा यशस्वीरित्या सुरू आहे. त्याच धर्तीवर दिवाळीनंतर कोकण क्रुझ बोट मुंबई-गोवा जलमार्गावर सुरू होत असून, त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरे पुन्हा गजबजणार आहेत. किनारपट्टीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. दिवाळीला अवघे काही दिवस सुरू राहिले असून, ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)