शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

मुंबई-गोवा बोटवाहतूक लवकरच सुरू होणार!

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या दिवाळीनंतर मुंबई-गोवा सागरी बोटवाहतूक सुुरू होणार आहे. कोकण बंदर विकास समितीचे अध्यक्ष आनंद हुले यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. रस्ते वाहतुकीला महत्व येण्याआधी ४० वर्षांपूर्वीच्या काळात कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोवा अशी जलमार्ग बोटवाहतूक सुरू होती. त्यावेळी बोटीद्वारे प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात होती. परिणामी कोकणच्या सागरी किनाऱ्यावरील सर्वंच बंदरे रात्रंदिवस गजबजलेली असायची. या बंदरांच्या भागात असलेल्या गावांचा, शहरांचा मोठा विकास झाला होता. त्यांची अर्थव्यवस्थाही याच बोटवाहतुकीवर चालायची. मात्र, रस्ते वाहतुकीची साधने वाढली. काळाच्या ओघात सागरी बोटवाहतूक बंद झाली. त्यानंतरच्या काळात बोटवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र, मुंबई - गोवा बोट वाहतूक सुरू व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोकण बंदर विकास समिती कार्यरत होती. पाठपुरावा सुरू होता. अखेर मुंबई-गोवा जलमार्गावर दिवाळीनंतर बोट वाहतूक सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विकास मंडळामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. सिंगापूरला स्टार क्रुझ बोट सेवा यशस्वीरित्या सुरू आहे. त्याच धर्तीवर दिवाळीनंतर कोकण क्रुझ बोट मुंबई-गोवा जलमार्गावर सुरू होत असून, त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरे पुन्हा गजबजणार आहेत. किनारपट्टीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. दिवाळीला अवघे काही दिवस सुरू राहिले असून, ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)