शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ३७.२ अंशांवर

By admin | Updated: February 16, 2017 04:57 IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबापुरीतले राजकीय वातावरण तापले असतानाच आता ऋतू बदलाच्या काळात येथील हवामानातही बदल

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबापुरीतले राजकीय वातावरण तापले असतानाच आता ऋतू बदलाच्या काळात येथील हवामानातही बदल नोंदवण्यात येत आहेत. प्रतिचक्रीवादळ, वाऱ्याची बदलती दिशा आणि वारे स्थिर होण्यास लागणारा विलंब हे घटक मुंबईतील कमाल तापमान वाढीस कारणीभूत आहेत. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत ही वाढ ५.७ अंश सेल्सिअस असून, बुधवारी मुंबईचे किमान तापमान ३७.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात हा काळ ऋतू बदलाचा आहे. या काळात तापमानात काही अंशी वाढ नोंदवण्यात येते. सद्य:स्थितीमध्ये मध्य प्रदेशावर प्रतिचक्रीवादळासारखी स्थिती असून, पूर्वेकडून दक्षिणेकडे वेगाने वारे वाहत आहेत. हवामानात हे बदल नोंदवण्यात येत असतानाच मुंबईचा विचार करता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. हे वारे स्थिर होण्यास उशीर होत असल्याने मुंबईच्या तापमानाचा पारा चढतो आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत तापमानात चढउतार होत राहतील आणि कमाल तापमान अधिक नोंदवण्यात येईल. (प्रतिनिधी)