शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

मुंबई @ ३६.१; शुक्रवार उष्ण दिवस राहणार

By admin | Updated: April 29, 2016 06:01 IST

बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असतानाच गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३६.१ अंश नोंदवण्यात आले आहे

मुंबई : बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असतानाच गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३६.१ अंश नोंदवण्यात आले आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घसरण झाली असली तरी उकाडा कायम राहिल्याने मुंबईकर त्रस्त झाले होते. तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येत असतानाच आता शुक्रवार (२९ एप्रिल) हा ‘उष्ण दिवस’ राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा पारा मुंबईकरांना आणखी चटके देईल. राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत असून, आता मुंबईच्या कमाल तापमानानेही ३८ अंशावर मजल मारली आहे. त्यामुळे वाढता उन्हाळा मुंबईकरांना नकोसा झाला असून, मुंबईकरांच्या शरीराहून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत. बुधवारपासून सलग मुंबईचे तापमान वाढत असून, ३८ ते ३६ अंशादरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. शिवाय तापदायक ऊन, वाढता उकाडा, उष्ण वारे व वाढती आर्द्रता मुंबईकरांचा अधिकाधिक घाम काढत असून, दुपारी ४ वाजेपर्यंत पडणारे रखरखते ऊन तापदायक ठरते आहे.अरबी समुद्रावरून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. वारे स्थिर होण्यास दुपार होत असल्याने ते तप्त होत आहेत. आर्द्रतेमध्ये चढ-उतार नोंदवण्यात येत आहे. उत्तरेकडील उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत असून, पुढील ४८ तासांसाठी मुंबईत अशीच परिस्थिती राहील, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले.>२४ तासांत मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.२९ ते ३० एप्रिल या काळात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २९ ते ३० एप्रिल या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.