शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

खोडद रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त

By admin | Updated: January 20, 2017 00:47 IST

सन २०१०मध्ये प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम झालेल्या नारायणगाव -खोडद रस्त्याची दुरवस्था झाली

खोडद : सन २०१०मध्ये प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम झालेल्या नारायणगाव -खोडद रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या कामाची तसेच दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त दिले आहे. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम झाल्यानंतर सन २०१५ पर्यंत या रस्त्याचा दोषदायित्व कालावधी होता. मात्र २०१५नंतर हा रस्ता जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत या रस्त्याची खूपच दुरवस्था झाली होती. जागतिक दर्जाच्या जीएमआरटी प्रकल्पाला जोडला जाणारा प्रमुख मार्ग असणारा व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेला नारायणगाव-खोडद रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले होते. या रस्त्यावरील असणारे खड्डे हे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरु करावे अशी मागणी खोडद आणि हिवरे ग्रामस्थांनी अनेकवेळा केली होती. याबाबत ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु झाल्याने खोडद व हिवरे गावच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नारायणगाव-खोडद रस्त्याच्या साईडपट्ट्यादेखील वाहून गेल्याने रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका आहे. या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)>साईडपट्ट्याही दुरुस्त कराजीएमआरटी प्रकल्पाला जोडल्या जाणाऱ्या अन्य ७ रस्त्यांचेही रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात, अशी मागणी खोडदचे सरपंच विजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव व जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जी. बी. पोहेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.